शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध, पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:30 AM

नव्या दिवसाची सुरुवात असो, नव्या नात्याची सुरुवात असो, आळस दूर करायचा असो किंवा सहज गप्पा मारायच्या असोत यात एक कप चहा सर्वांनाच हवा असतो.

(Image Credit : Momspresso)

नव्या दिवसाची सुरुवात असो, नव्या नात्याची सुरुवात असो, आळस दूर करायचा असो किंवा सहज गप्पा मारायच्या असोत यात एक कप चहा सर्वांनाच हवा असतो. पण जर तुम्ही जर त्या लोकांपैकी आहात ज्यांच्या चहा घेतल्याशिवाय दिवसच उगवत नाही आणि तुम्ही बेड टी चाहते असाल तर वेळीच सावध व्हा. चहामध्ये कॅफीनसोबतच एल-थायनिन आणि थियोफायलिन असतं ज्याने तुम्हाला फ्रेश तर वाटतं पण याचे काही गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. 

मळमळ आणि अस्वस्थता

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पित्त रस तयार होण्याच्या आणि काम करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडतो. या कारणाने मळमळ होऊ शकते आणि घाबरल्यासारखंही वाटू शकतं. 

(Image Credit : Video Blocks)

अल्सरचं धोका

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अल्सर आणि हायपर अॅसिडिटी होण्याचा धोका असतो. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटाच्या आतील बाजूस जखम होण्याची शक्यताही वाढते. 

पोट फूगण्याची शक्यता

असे मानले जाते की, ब्लॅक टी आरोग्यासाठी चांगला असतो आणि याने वजनही कमी होतं. पण रिकाम्या पोटी ब्लॅक टी प्यायल्याने पोट फूगतं आमि भूकही लागत नाही. 

(Image Credit : Bustle)

मूड-स्विंगची समस्या

रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने लवकर थकवा जाणवतो. तसेच मूड-स्विंगची समस्याही वाढू लागते.

हाडांची समस्या

रिकाम्या पोटी चहाने स्केलेटल फ्लोरोसिस नावाचा आजार होऊ शकतो. या आजाराने शरीराच्या आतल्या आतल्या समस्या वाढतात. या आजाराने शरीरात आर्थरायटिससारख्या वेदना होऊ लागतात. 

जास्त चहा प्यायल्याने नुकसान

- दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

- आयर्न अब्जॉर्ब केल्याने शरीराची क्षमता कमी होऊ लागते. 

- कॅफीनचं अधिक प्रमाण असल्याने चहाची सवय लागू शकते. 

- जास्त चहा प्यायल्याने पचनक्रियेत समस्या येऊ शकते. 

- रात्री उशीरा चहा प्यायल्यास झोप न येण्याची समस्या होऊ शकते. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स