शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चमकदार फळांना बळी पडताय का?; मग 'हे' नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:53 IST

तुम्ही बाजारात फळं खरेदी करण्यासाठी गेल्यावर तिथे असलेल्या चमकदार फळांना पाहून तुम्ही त्यांना ताजी फळं समजत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.

(Image Credit : www.hirofukuchi.com)

तुम्ही बाजारात फळं खरेदी करण्यासाठी गेल्यावर तिथे असलेल्या चमकदार फळांना पाहून तुम्ही त्यांना ताजी फळं समजत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. खरं तर ही फळं घातक केमिकल्सचा वापर करून चमकवण्यात आलेली असतात. फळं पॉलिश करण्यासाठी वापरण्यात आलेली रसायनं आरोग्यासोबतच लिव्हरसाठीही अत्यंत घातक ठरतात. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. 

फळं चमकदार म्हणजे ताजी नाहीत

जेवढं या दिवसांमध्ये कृत्रिम पॉलिशने फळांना चमकवण्यात येतं. तेवढी ताजी फळंही चमकदार नसतात. यासाठी वार्निशसारख्या रसायनांचा वापर करण्यात येतो. अनेकदा तर मेणाचा वापर करूनही फळांची चमक वाढविण्यात येते. त्याचबरोबर कार्बाइड पावडरचाही व्यापारी उपयोग करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामुळे मानवाच्या शरीरामध्ये टॉक्सिन्सची मात्रा वाढते. तसेच हे लिव्हर, कीडण्यांसाठी नुकसानदायी असतं. 

(Image Credit : StyleCraze)

द्राक्षं आणि सफरचंद सर्वात जास्त धोकादायक 

चमकदार दिसणाऱ्या फळांमध्ये सर्वात जास्त समावेश हा द्राक्ष आणि सफरचंदाचा असतो. व्यापारी यांवर सर्वाधिक रसायनांचा समावेश करतात. असं मानलं जातं की, फळांमध्ये जेवढा वेळ ओलावा टिकतो तोपर्यंत ती ताजी दिसतात. त्यामुळे दुकानदारांकडून फळांवर मेणाची लेयर चढवण्यात येते. ज्यामुळे फळांचे पोर्स बंद होतात आणि त्यातील ओलावा बाहेर पडत नाही. असं लवकर खराब होणाऱ्या फळांवर करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष आणि सफरचंदाचा समावेश असतो. 

फळं बनतात विष

फळांचं सेवन शरीरामध्ये आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण करतात. परंतु फळांची विक्री वाढविण्यासाठी तसेच त्यांची चमक वाढविण्यासाठी पॉलिश करणं फळांसाठी विषारी ठरू शकतं. ही घातक रसायनं लिव्हरमध्ये पोहोचल्याने त्यासाठी घातक ठरतात. फक्त एवढचं नाही तर यामुळए किडनी डॅमेज होण्याचा धोकाही वाढतो. 

लिव्हरला नुकसान पोहोचवतं

फळांवर वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा थेट परिणाम लिव्हरवर होत असतो. लिव्हर प्रभावित झाल्याने काविळ आणि आतड्यांच्या समस्यांनी त्रस्त होतात. खरं तर तत्काळ उपचारांनी हे ठिक होतं. परंतु त्यानंतर पोटासंबंधीच्या आजारांचा धोका आणखी वाढतो. बराच वेळ अशा फळांचं सेवन केल्याने लिव्हर खराब होण्याची शक्यता आणखी वाढते. 

शरीराच्या इतर भागांवरही होतो परिणाम

चमकदार फळं खाल्याने यामध्ये अस्तित्वात असणारे केमिकल्स शरीरामध्ये जाऊन शरीराच्या अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरतात. खासकरून सर्वात जास्त केमिकलयुक्त फळांच्या सेवनाने लिव्हर खराब होतं. त्यानंतर याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवरही होतो. 

हानिकारक रसायनांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा या टिप्स :

  • खरेदी करताना लक्षात ठेवा की जास्त चमकणारी फळं खरेदी करणं टाळा
  • ज्या फळांना विशेष पॅकिंग करण्यात आलेली असते, त्यांना खरेदी करणं टाळा.
  • सीझनल आणि सहज उपलब्ध होणारी फळं खरेदी करा
  • कधीही फळ न धुता खाऊ नका

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स