शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

Ayurveda Tips: जेवताना पाणी प्यावं की एकदम जेवण झाल्यावरच?; आयुर्वेदात सांगितलंय नेमकं तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 13:38 IST

Water Drinking Tips : अनेकांना जेवण करताना पाणी पिण्याची सवय असते. तर काही लोक हे जेवण झाल्या झाल्या ढसाढसा पाणी पितात.

Water Drinking Tips : आयुर्वेदाचा वापर भारतात प्राचीन काळापासून केला जात आहे. वनस्पतींपासून तयार अनेक औषधं आजही लोक आजार दूर करण्यासाठी करतात. सोबतच आयुर्वेदात दैनंदिन जीवनासंबंधी अनेक सल्लेही दिले आहेत. ज्यामुळे आरोग्य चांगलं आणि शरीरही चांगलं राहतं. आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे.

अनेकांना जेवण करताना पाणी पिण्याची सवय असते. तर काही लोक हे जेवण झाल्या झाल्या ढसाढसा पाणी पितात. तुम्हालाही ही सवय असेल तर ही सवय वेळीच बदला. आयुर्वेदानुसार, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे. 

अनेकजण डोसा, पिझ्झा, भटूरे, बरगर खातांना सॉफ्ट ड्रिंक पितात. त्यांना असं वाटतं की, असे केल्यास त्याना ते पदार्थ डायजेस्ट होतील. पण असा विचार करणे चुकीचे आहे. याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. 

जेवताना पाणी प्यायल्याने काय होतं?

जेवण करताना पाणी प्यायल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. जेवताना पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढतो. याने पचनक्रियेवर प्रभाव पडतो. जेवताना पाणी प्यायल्यास अन्न पचनाची प्रकिया हळुवार होते. याने पोटाचे विकार होतात. 

आपण जे खातो त्यावर जठारात पचनक्रिया होते. जठराग्नी ही खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचनक्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

जेवताना पाणी प्यायल्याने ही जठराग्नी समाप्त होते. ही जठराग्नी जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. त्याने एक दुष्टचक्र सुरू होते. महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात. 

आयुर्वेदानुसार जेवताना पाणी पिण्याच्या टिप्स

1) आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते.

2) तसेच जेवणाता कोमट पाण्याचे छोटे घोट घेतल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि अॅसिडही वाढत नाही. जेवताना थंड पाणी टाळा. याने जठराग्नी विझते.

3) आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर पाणी पिण्यासाठी साधारण 30 मिनिटे थांबावं. याने पचनक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय होते.

4) जेवण केल्यावर लगेच पाणी प्याल तर याने पचनक्रिया प्रभावित होते. ज्यामुळे तुम्हाला गॅस, अॅसिडिटी किंवा पोटात अॅसिड वाढण्याची समस्या होऊ शकते.

या गोष्टींची घ्या काळजी

1) जेवण करताना अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर थोडं पाणी प्यावे. 

2) जर जेवण केल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होणार नाही. जेवण योग्य प्रकारे चावून खाल्लास पचन चांगलं होतं. 

4) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी भरपूर पाणी प्यावे. 

योग्यवेळी पाणी पिण्याचे फायदे

- जेवण केल्यावर एक तासांनंतर पाणी प्यायल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं. 

- योग्यवेळी पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली राहते. 

- पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होत नाही.

- शरीरात अन्नातील पोषक तत्व चांगल्याप्रकारे शोषूण घेतं.

- याने झोपली चांगली लागते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य