शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

'पायी चालणे आणि झोपण्याबाबत सर्वात मागे आहेत भारतीय' - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 10:12 IST

अमेरिका ब्रिटन, जपान आणि सिंगापूरसहीत १८ देशांतील लोकांच्या डेटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. 

(Image Credit : news.yahoo.com)

काम करण्याबाबतीत भलेही भारतीय सर्वात पुढे असतील, पण फिटनेस आणि अ‍ॅक्टिव राहण्याबाबत भारतीय सर्वात मागे आहेत. एका रिपोर्टनुसार, भारतातील लोक सर्वात कमी एनर्जेटिक असतात आणि रोज सरासरी भारतीय केवळ ६ हजार ५५३ पावलेच चालतात. जे या रिसर्चमध्ये सहभागी सर्वच देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. अमेरिका ब्रिटन, जपान आणि सिंगापूरसहीत १८ देशांतील लोकांच्या डेटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. 

किती झोप घेतात भारतीय?

(Image Credit : quillette.com)

रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, भारतीय झोप घेण्याबाबतही फार मागे आहेत. जपाननंतर भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जे सर्वात कमी झोप घेतात. भारतातील लोक सरासरी रात्री ७ तास १ मिनिटेच झोपतात. आयरलॅंडमध्ये लोक सर्वात जास्त सरासरी ७ तास ५७ मिनिटे म्हणजेच जवळपास ८ तास झोप घेतात. १८ देशांमधून एकत्र करण्यात आलेल्या या डेटाच्या आधारावर सांगण्यात आलं आहे की, भारतीय लोक दिवसातील केवळ सरासरी ३२ मिनिटेच एनर्जेटिक राहतात. इतकेच नाही तर हॉंगकॉंगच्या लोकांच्या तुलनेत भारतीय रोज ३६०० पावलेच चालतात.

अर्ध्या रात्रीनंतर झोपतात १८ ते २५ वयातील लोक

(Image Credit : healthline.com)

तेच झोपेच्या बाबतीत भारतात ७५ ते ९० वर्षाच्या लोकांची स्थितीत आणखी खराब आहे. ते सरासरी ६ तास ३५ मिनिटेच झोपू शकतात. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, १८ ते २५ वर्षाचे भारतीय सरासरी रात्री १२ वाजून ३३ मिनिटांनी झोपतात. तेच वयोवृद्ध लोक त्यांच्या एक तास आधी झोपतात. 

चालणे आणि वजन कमी करणे

(Image Credit : popsugar.co.uk)

याआधीही वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आले आहे की, वजन कमी करण्यासाठी पायी चालणे हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागत नाहीत. तसेच याला वेळीची कोणतीही बंधने नाहीत. तुम्ही सकाळी, दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतरही चालू शकता. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी म्हणून किती पावले चालावी? असा प्रश्न अनेकांना पडतो.

किती पायी चालावं?

तुम्ही जर नुकतंच वजन कमी करण्यासाठी पायी चालणे सुरू केले असेल तर तुम्ही तुमचं स्वत:चं एक लक्ष्य ठरवा. सुरूवातीला तुम्ही दररजो १० हजार पावले चालू शकता. एकदा तुम्हाला इतकं चालण्याची सवय झाली की, मग तुम्ही हे वाढवा. नंतर तुम्ही १२ हजार, १५ हजार पावले चालू शकता. 

(Image Credit : news.com.au)

वयानुसार कुणी किती पावले चालावी?

एका रिसर्चनुसार, ६ ते १७ वयोगटातील मुलांनी दररोज १५ हजार पावले चालावीत. तर या वयोगटातील मुलींनी १२ हजार पावले चालावीत. तर १८ ते ४० वयोगटातील महिला आणि पुरूषांनी १२ हजार पावले चालावे. ४० ते ५० वयोगटातील महिलांनी दररोज ११ हजार पावले चालले पाहिजे. तर ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषांनी ११ हजार पावले चालावीत.  

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनFitness Tipsफिटनेस टिप्स