शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

भाज्यांच्या ज्युसची मात्रा ठरतेय गुणकारी,  निरोगी जीवनासाठी चांगला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 09:00 IST

कारले, टॉमेटो, काकडी, बीट, भोपळा, अननस तसेच बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कडीपत्ता पुदीना या पानांपासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची मागणी सध्या वाढते आहे. निरोगी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून त्यांचा प्रसार सुरू आहे. आरोग्यशास्त्राच्या आधारे तयार केलेले रस चवदार, आरोग्यवर्धक असल्याने सध्या फिरायला जाणाऱ्यांमध्ये त्याची क्रेझ वाढताना दिसते.

- जान्हवी मोर्येडोंबिवली -  कारले, टॉमेटो, काकडी, बीट, भोपळा, अननस तसेच बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कडीपत्ता पुदीना या पानांपासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची मागणी सध्या वाढते आहे. निरोगी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून त्यांचा प्रसार सुरू आहे. आरोग्यशास्त्राच्या आधारे तयार केलेले रस चवदार, आरोग्यवर्धक असल्याने सध्या फिरायला जाणाऱ्यांमध्ये त्याची क्रेझ वाढताना दिसते.बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आरोग्याबाबतची सजगता वाढते आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जीममध्ये व्यायाम, चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे, विविध खेळ खेळणे, नृत्यप्रकाराकडे अनेकांचा कल वाढतो आहे. या जोडीला सेंद्रीय भाजीपाल्यावर भर देणे, संतुलित आहार घेणे, जेवणाच्या वेळा पाळणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार, विविध रस (ज्युस) घेण्यावर अनेकांचा भर असतो.शहरातील मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिरानजीक असलेल्या नाना-नानी पार्क बाहेर सुनीता दवते भाज्यांपासून ज्यूस बनवतात. त्यांचा हा आरोग्यदायी उपक्रम सगळ््यांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. दवते यांचा आहारशास्त्रावर अधिक भर आहे. निरोगी राहण्यासाठी विविध भाज्यांचे रस गुणकारी ठरतात, असे त्यांनी सांगितले.‘इंटरनॅशनल असोसिएशन सायंटीफिक फॉर पीच ओरायलझम’ या संस्थेने घेतलेल्या सात दिवसांच्या शिबिराला दवते यांनी नुकतीच उपस्थिती लावली. त्याचा त्यांना फायदा झाला. या शिबिरात भाज्या आणि फळांचे रस तयार करायला त्या शिकल्या आणि उद्यानाशेजारी त्याला सुरुवातही केली. तेथे भाज्यांबरोबर मिल्कशेक मिळतात. मात्र, त्यातून विरूद्ध एकत्र एकत्र होऊ नये यासाठी त्या नेहमीच्या दुधाऐवजी नारळचे दूध वापरतात. या कोकोनट मिल्कशेकची चव व स्वादही बदलतो. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स जास्त असल्याने त्याचे पनीर (टोफू), श्रीखंड, मठ्ठा यांची स्वतंत्र श्रेणी आरोग्यसंवर्धनासाठी उपलब्ध झाली आहे.कारले, टॉमेटो, काकडी एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा गुडघेदुखीवर लाभदायक ठरतो. गाजर, बीट एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा रक्तशुद्धीकरण वाढवतो. दुधी भोपळा व अननस एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा लठ्ठपणा कमी करून पचनशक्ती सुधारण्यास मदत करतो. भाज्यांच्या ज्यूसबरोबरच ग्रीन ज्यूसला मागणी असल्याचे त्या सांगतात.फळझाडे व फुलझाडांची पाने, बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कढीपत्ता, पुदीना घालून ग्रीन ज्यूस तयार केला जातो. या ज्युसमुळे उत्साह वाढतो. ज्युससाठी वापरली जाणारी काही पाने, फुले ही डोंबिवलीतून मिळतात; तर काही नाशिकहून मागवली जातात. वेगवेगळ््या प्रकारचे ४० ज्यूस ही सकाळी फिरायला येणाºयांची सोबत करतात.शेवपुरी, पाणीपुरीतही भाज्यांचा रस-भाज्यांचे सूप, भाज्यांचे कटलेट, भाज्यांची भजी बनवली जाते. त्यातही पिठाचे प्रमाण अवघे २० टक्के तर ८० टक्के भाज्यांचे प्रमाण असते. शेवपुरी, पाणीपुरीत भाज्यांचे रस व कडधान्य वापरले जाते. त्यामुळे ती चवदार बनते.-भाज्यांच्या ज्यूसमुळे मधुमेह व रक्तदाबाचे आजार दूर पळू लागतात. इतकेच नव्हे, तर डायलिसिसच्या काही रुग्णांनाही त्याचा चांगला लाभ होतो, असा दावा दवते करतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स