शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2018 : नवरात्रीच्या उपवासामुळेही शरीराला होतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:16 IST

नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीचं पितात तर काही लोकं फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.

नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीच पितात तर काही लोक फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. तसं पहायला गेलं तर नवरात्रीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व असतंच परंतु उपवास करणं शरीरासाठीही लाभदायक असतं. जाणून घेऊया उपवासाचे शरीराला होणारे फायदे...

1. उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते. 

2. उपवासादरम्यान फॅट्स बर्न होण्याचं प्रक्रिया जलद गतीने होते आणि वजन नियंत्रणात आणणं शक्य होतं. 

3. शरीरातील फॅट्स सेल्समधून लॅप्टिन नावचं एक हार्मोन स्त्रवलं जातं. उपवासादरम्यान कमी कॅलरीज मिळाल्याने लॅप्टिनची सक्रियतेवर प्रभाव पडतो आणि वजन कमी होते. 

4. उपवासादरम्यान काही आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळणे गरजेचे असतात. शरीराला आवश्यक पोषक तत्व नाही मिळाली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासामध्ये किंवा उपवास सोडल्यानंतर तुम्ही जे काही खात असाल ते सर्व पदार्थ पौष्टीक असतील याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. अशावेळी जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणं टाळा अन्यथा वजन कमी होण्याऐवजी पटकन वाढण्याची शक्यता अधिक असते. 

5. उपवास करण्यामुळे नवीन रोग प्रतिरोधक पेशी तयार होण्यास मदत होते. यूनिवर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियातील अभ्यासकांनी सांगितलं की, कॅन्सरच्या रूग्णांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरतं. खसकरून त्या रूग्णांसाठी जे कीमोथेरपी घेत आहेत.

6. गरजेचं नाही की, एखाद्या सणाला किंवा खास दिवशी उपवास ठेवावा. शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठीही तुम्ही उपवास करू शकता. 

7. अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, काही वेळासाठी उपवास केल्याने मेटाबॉलिक रेटमध्ये 3 ते 14 टक्क्यांनी वाढ होते. खरचं असं असेल तर पचनक्रिया आणि कॅलरी बर्न होण्यासाठी मी वेळ लागेल.

8. उपवास केल्याने डोकं शांत राहतं. त्याचप्रमाणे डिप्रेशन आणि मेंदूशी जोडलेल्या अनेक समस्यांपासूनही सुटका होते. 

9. उपवासादरम्यान तुम्हाला तुमच्या भूकेचा अंदाज येतो. 

10. सध्या तणाव ही एक फार मोठी समस्या आहे. उपवास केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य