शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

काळजी वाढली! महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना 

By manali.bagul | Updated: October 1, 2020 13:08 IST

Congo fever in maharashtra : या आजाराच्या रुग्णाच्या रक्ताशी, घामाशी किंवा अवयव व शरीराशी इतरांचा संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.

कोरोना व्हायरसनं गेल्या अनेक महिन्यांपासून कहर केला आहे. मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता  महाराष्ट्रात अजून एका घातक आजारानं मान वर काढायला सुरूवात केली आहे. त्यानंतर पालघर जिल्हा प्रशासनानी मंगळवारी क्रेमियन काँगो हेमोऱ्हागिक फीव्हर (Crimean Congo Hemorrhagic Fever CCHF) म्हणजेच काँगो तापाचा प्रसार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. यासह नागरिकांना सर्तकतेचं आवाहन केलं आहे. 

गुजरातमधील काही जिल्ह्यात या आजाराचा प्रसार झाला असून महाराष्ट्रातही या आजाराचा प्रसार होऊ शकतो असे पालघर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत डी. कांबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात सांगण्यात आले आहे. या परिपत्रकात या आजारापासून लांब राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी,  लक्षणं काय आहेत. तसंच हा आजार कशामुळे पसरतो याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या काँगो तापाबद्दल महत्वाच्या गोष्टी.

काँगो हा आजार गोचिडीच्या संपर्कात आलेल्या माणसाला होऊ शकतो. गोचीडीपासून हवेत प्रसारित होणाऱ्या Bunyaviridae family या वर्गातल्या Nairovirus नावाच्या विषाणूपासून माणसाला हा आजार होऊ शकतो. गोचिडी पशुपालनातील पाळीव प्राण्यांच्या अंगावर असते. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. 

कसा पसरतो हा आजार

गोचिड चावल्यामुळे किंवा हा आजार झालेल्या जनावराच्या रक्ताचा संपर्क आल्याने लगेचच ज्या पेशी माणसाच्या शरीरावर राहतात त्यांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचं माणसात संक्रमण होऊ शकतं. आतापर्यंत हा आजार झालेल्यांमध्ये जनावरांशी संबंधित व्यवसाय करणार म्हणजे शेतकरी, पशूपालक, कत्तलखान्यातील कामगार आणि पशुतज्ज्ञ मोठ्या प्रमाणात समावेश होता अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. या आजाराच्या रुग्णाच्या रक्ताशी, घामाशी किंवा अवयव व शरीराशी इतरांचा संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.

या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने अफ्रिका, बाल्कन प्रदेश, मध्यपूर्वेतील आणि आशियातील देशांमध्ये झाल्याचं दिसून आलं आहे.गोचीड चावल्यास आजार झाला तर त्याचा इनक्युबेशन काळ 3 ते जास्तीत जास्त 9 दिवस असतो. रुग्णाच्या रक्ताच्या किंवा पेशींच्या संपर्कात आल्याने याची लागण झाली तर इनक्युबेशन काळ 5 ते 6 दिवसांपासून 13 दिवसांपर्यंत असतो.

लक्षणं

डोकेदुखी, डोळे चुरचुरणं, प्रखर प्रकाशाचा त्रास होणं, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणं, अंग जड होणं, मानदुखी, अंगदुखी, पाठदुखी, सतत ताप येणं, सतत झोप येणं. ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. काँगो तापाचा मृत्यूदर 30 टक्के असून, हा रुग्ण आजार झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. वेळेत उपचार घेतल्यास हे टाळता येऊ शकतं. विशेष म्हणजे या आजारावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.  रिबाव्हिरिन (Ribavirin) हे  औषध या संसर्गावर उपचार करताना उपयोगी पडल्याचं दिसून आलं आहे. औषध तोंडाद्वारे आणि इंजेक्शनच्यामार्फत लसेतून दिलं तरीही परिणामकारक ठरतं. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सpalgharपालघर