शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लिंबू, संत्री, आवळ्याने बरा होतो प्रदूषित कर्करोग, त्वचारोग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:53 IST

शंख, शिंपल्यावर यशस्वी प्रयोग : अमरावती विद्यापीठात शरद महाजन यांचा शोधनिबंध

गणेश वासनिक

अमरावती : जमिनीतील जाड धातूयुक्त आणि अति प्रदूषित पाणी मुनष्याला प्यावे लागत असल्याने शरीरावर आघात होते. मात्र, जीवनसत्व 'क'चा मनुष्याच्या शरीरात पुरवठा झाल्यास कर्करोग, तत्वारोग व रक्ताक्षय अशा जीवघेणी आजारापासून मुक्ती मिळेल, असा शोधनिबंध ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील के. वि. पेंढरकर महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक शरद महाजन यांनी सादर केला आहे. 

'गोड्या पाण्यातील शिंपल्याच्या पचनग्रंथीत होणाऱ्या 'आर्सेनिकॉसीस' या सदोषावर जीवनसत्व 'क' उपायात्मक भूमिका या विषयावरील त्यांच्या शोध प्रबंधाला अमरावती विद्यापीठाने द्वितीय क्रमांकाने गौरविले आहे. केंद्रीय अनुदान आयोग, प्राणीशास्त्र विभाग व आयक्यूसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 22 व 23 जानेवारी रोजी प्राणीशास्त्रावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. यावेळी शरद महाजन यांनी पश्चिम बंगाल, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका हा भारतातील 'आर्सेनिक बेल्ट' असल्याचे भूगर्भशास्त्राचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. 

काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत आहे. कुपनलिकेतून अनियंत्रित पाण्याचा उपसा वाढला आहे. भूजलस्तर खोलवर गेले आणि गढूळ पाणी मनुष्याला प्यावे लागत आहे. कीटकनाशकांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर वाढला आहे. वाढत्या लोकसंख्येने प्रदूषण पातळी उंचावली आहे. त्यामुळे जमिनीतील जड धातूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गढूळ, क्षारयुक्त आणि अतिप्रदूषित पाण्यामुळे शंख, शिंपल्याच्या जीवनावर झालेला परिणामावर महाजन यांनी यशस्वी प्रयोग केला. प्रदूषणाने झालेले कर्करोग, त्वचारोग आणि रक्ताशयावर 'क' जीवनसत्वाने मात करता येते. जाड धातूयुक्त, अतिप्रदूषित पाण्यामुळे शिंपल्यावर परिणाम झाला. तेच निकष मानवालादेखील लागू होते, हे त्यांनी शोधप्रबंधात मांडले आहे. 'क' जीवनसत्व पाण्यामध्ये द्रावणीय अवस्थेत ऋण आयर्न तयार करतात. त्याचा संयोग होऊन धातूंच्या धनमुलकांशी संयोग होऊन उदासिनीकरण होते. तो क्षार मुत्राकडे उत्सर्जित केला जातो. त्यामुळे धातूंचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. धातू प्रदूषणाचा मनुष्याच्या शरीरावर आघात झाल्यास 'क' जीवनसत्व असलेले लिंबू, संत्री, आवळा सेवन केल्यास कर्करोग, त्वचारोग, रक्ताशय असे आजार टाळता येते. मनुष्य, गिनी पिग्ज आणि माकडवर्गीय प्राण्यांमध्ये जीवनसत्व 'क' होऊ शकत नाही. त्यामुळे आहारात दररोज 10 ते 20 मिली ग्रॅम इतकेच किंवा त्यापेक्षा 'क' जीवनसत्वाचे सेवन झाल्यास 'स्कर्व्ही' या विकाराबरोबरच इतर शरीर प्रक्रियांवर ताण पडतो. पाणी उकळून प्यायल्याने रोगजीव मरतात. मात्र, त्यातील क्षाराची मुख्यत: धातूच्या क्षारांची मात्रा कमी होत नसते, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. 'क' जीवनसत्व पाण्यामध्ये द्रावणीय अवस्थेत ऋण आयर्न तयार करतात व त्याचा संयोग होऊन धातुंच्या धनमुलकांशी संयोग होऊन उदासिनीकरण होते. तो क्षार मुत्राकडे उत्सर्जित केला जातो. त्यामुळे धातूंचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. महाजन यांनी शोधप्रबंधात पूर्वप्रतिरक्षात्मक व उपचारात्मक असे दोनही प्रकारे सकारात्मक परिणाम धातू प्रदूषणाच्या प्रति मिळालेले दिसून येतात. या शोधप्रबंधासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील सुरेशचंद्र झांबरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

अशा कराव्यात उपाययोजना :

- विहिरींची जलपातळी खोलवर जात असल्याने वर्षाकाठी प्रयोगशाळेतून जलपरिक्षण करावे

- कूपनलिकेची खोली वाढविण्यासाठी पावसाळ्यात नवतंत्रज्ञानाने पुर्नजिवीत करणे

- लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळे सेवन करणे. उदा. संत्रा, लिंबू, आवळा, देशी चिंच, आमसूल, पेरू आदी

- डबाबंद अन्न, मासे किंवा औषधे जास्त दिवस घरात साठवून ठेवू नये

'गोड पाण्यातील शिंपल्याच्या पचनग्रंथीत होणाऱ्या 'आर्सेनिकॉसीस' या सदोषावर जीवनसत्व 'क' उपायात्मक भूमिका या विषयावरील शोधप्रबंधाला दुसरा क्रमांकाने गौरविले आहे. आवळा, लिंबू, पेरू, संत्राज्यूस सेवन केल्यास विविध रोगावर मात शक्य आहे, हे शरद महाजन यांच्या शोधनिबंधातून सिद्ध होते.

- एच.पी. नांदूरकर,प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारAmravatiअमरावती