शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:24 IST

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही.

(Image Credit : Healthline)

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. उन्हाळ्या डिहायड्रेशनची समस्या होते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलेच असेल पण कधी ओव्हरहाड्रेशन ऐकलंय का? जसं डिहायड्रेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरतं तसंच ओव्हरहायड्रेशनही आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. चला जाणून घेऊ काय आहे ओव्हरहायड्रेशन...

किती पाणी पिणे गरजेचे?

पाण्याची गरज वय आणि शारीरिक श्रमानुसार बदलत राहते. म्हणजे जर तुम्ही असं काही काम करता ज्यात तुम्हाला फार जास्त घाम येतो तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. पण जर असं नसेल तर तुमच्या शरीराला फार जास्त पाण्याची गरज पडणार नाही. पण सामान्य धारणा अशी आहे की, एका चांगलं आरोग्य असलेल्या व्यक्तीने एका दिवसात २ ते ४ लिटर पाणी प्यावं. विशेष स्थिती जसे की, जिम, एक्सरसाइज, जड मेहनत किंवा गरमीमुळे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पण जर सामान्यपणे जर तुम्ही रोज ५ ते ६ लिटर पाणी पित असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर उलटा प्रभाव पडू शकतो. 

(Image Credit : Living-Water)

जास्त पाणी पिणे का धोकादायक?

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. सर्वात मोठी बाब ही आहे की, अनेक लोक जास्त पाणी प्यायल्याने वजन वाढण्यालाही घाबरतात. पण मुळात आपलं वजन तेव्हाच वाढतं जेव्हा शरीरात फॅट जमा होतं. जमा झालेल्या फॅट सेल्समध्ये पाण्याचं प्रमाणही असतं. अशात जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर किडनी पूर्ण पाणी शरीरातून बाहेर काढण्यास सक्षम नसते. शिल्लक राहिलेलं पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बिघडवतं. याने पाणी शरीरात जमा होतं आणि त्यामुळे वजन वाढतं. 

मेंदूला येऊ शकते सूज

द हेल्थ साईटनुसार, एका शोधात असं आढळलं आहे की, शरीरात जास्त प्रमाणात पाणी झाल्यावर सोडियमचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागतं. सोडियमचं प्रमाण कमी झाल्याने मेंदूला सूज येऊ शकते. ही एक गंभीर समस्या होऊ शकते. शोधात असंही आढळलं की, जास्त पाणी प्यायल्याने शरीरात असामान्य रूपाने सोडियम कमी होऊ लागतं, त्यामुळे हायपोट्रिमियाचा धोका वाढतो. सोडियम एकप्रकारचं इलेक्ट्रोलाइट आहे, जे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं. 

का पितात जास्त पाणी?

सामान्यपणे जास्त सोडियम आणि कमी पोटॅशिअमच्या सेवनने फार जास्त तहान लागते. मीठ सोडियमने तयार होतं, त्यामुळे जास्त मीठ खाणाऱ्यांना जास्त तहान लागते. मीठ सेल्समधून पाणी बाहेर काढतं. अशात जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर तुमच्या पेशी मेंदूला लवकर लवकर तहान लागण्याचा संकेत पाठवू लागते. 

लागोपाठ जास्त पाणी सेवन नको

जर एखाद्या दिवशी तुम्ही जास्त पाणी सेवन केलं असेल तर किडनी हळूहळू ते पाणी बाहेर काढण्याचं काम करत असते. २४ तासातच हे जमा झालेलं पाणी शरीराच्या बाहेर निघतं. पण जास्त पाणी पिणे हे तुमची रोजची सवय झाली असेल तर हे पाणी बाहेर काढण्यास किडनीला अडचण येते. याने किडनी फेल होण्याचाही धोका वाढू शकतो. 

(Image Credit : Healthline)

कसं घातक आहे ओव्हरहायड्रेशन

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या होऊ लागते. ओव्हरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. किडनी आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्याचं काम करतात. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर किडनींच्या कामावर ओझं जास्त होतं. ज्यामुळे पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स