शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:24 IST

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही.

(Image Credit : Healthline)

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. उन्हाळ्या डिहायड्रेशनची समस्या होते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलेच असेल पण कधी ओव्हरहाड्रेशन ऐकलंय का? जसं डिहायड्रेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरतं तसंच ओव्हरहायड्रेशनही आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. चला जाणून घेऊ काय आहे ओव्हरहायड्रेशन...

किती पाणी पिणे गरजेचे?

पाण्याची गरज वय आणि शारीरिक श्रमानुसार बदलत राहते. म्हणजे जर तुम्ही असं काही काम करता ज्यात तुम्हाला फार जास्त घाम येतो तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. पण जर असं नसेल तर तुमच्या शरीराला फार जास्त पाण्याची गरज पडणार नाही. पण सामान्य धारणा अशी आहे की, एका चांगलं आरोग्य असलेल्या व्यक्तीने एका दिवसात २ ते ४ लिटर पाणी प्यावं. विशेष स्थिती जसे की, जिम, एक्सरसाइज, जड मेहनत किंवा गरमीमुळे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पण जर सामान्यपणे जर तुम्ही रोज ५ ते ६ लिटर पाणी पित असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर उलटा प्रभाव पडू शकतो. 

(Image Credit : Living-Water)

जास्त पाणी पिणे का धोकादायक?

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. सर्वात मोठी बाब ही आहे की, अनेक लोक जास्त पाणी प्यायल्याने वजन वाढण्यालाही घाबरतात. पण मुळात आपलं वजन तेव्हाच वाढतं जेव्हा शरीरात फॅट जमा होतं. जमा झालेल्या फॅट सेल्समध्ये पाण्याचं प्रमाणही असतं. अशात जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर किडनी पूर्ण पाणी शरीरातून बाहेर काढण्यास सक्षम नसते. शिल्लक राहिलेलं पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बिघडवतं. याने पाणी शरीरात जमा होतं आणि त्यामुळे वजन वाढतं. 

मेंदूला येऊ शकते सूज

द हेल्थ साईटनुसार, एका शोधात असं आढळलं आहे की, शरीरात जास्त प्रमाणात पाणी झाल्यावर सोडियमचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागतं. सोडियमचं प्रमाण कमी झाल्याने मेंदूला सूज येऊ शकते. ही एक गंभीर समस्या होऊ शकते. शोधात असंही आढळलं की, जास्त पाणी प्यायल्याने शरीरात असामान्य रूपाने सोडियम कमी होऊ लागतं, त्यामुळे हायपोट्रिमियाचा धोका वाढतो. सोडियम एकप्रकारचं इलेक्ट्रोलाइट आहे, जे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं. 

का पितात जास्त पाणी?

सामान्यपणे जास्त सोडियम आणि कमी पोटॅशिअमच्या सेवनने फार जास्त तहान लागते. मीठ सोडियमने तयार होतं, त्यामुळे जास्त मीठ खाणाऱ्यांना जास्त तहान लागते. मीठ सेल्समधून पाणी बाहेर काढतं. अशात जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर तुमच्या पेशी मेंदूला लवकर लवकर तहान लागण्याचा संकेत पाठवू लागते. 

लागोपाठ जास्त पाणी सेवन नको

जर एखाद्या दिवशी तुम्ही जास्त पाणी सेवन केलं असेल तर किडनी हळूहळू ते पाणी बाहेर काढण्याचं काम करत असते. २४ तासातच हे जमा झालेलं पाणी शरीराच्या बाहेर निघतं. पण जास्त पाणी पिणे हे तुमची रोजची सवय झाली असेल तर हे पाणी बाहेर काढण्यास किडनीला अडचण येते. याने किडनी फेल होण्याचाही धोका वाढू शकतो. 

(Image Credit : Healthline)

कसं घातक आहे ओव्हरहायड्रेशन

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या होऊ लागते. ओव्हरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. किडनी आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्याचं काम करतात. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर किडनींच्या कामावर ओझं जास्त होतं. ज्यामुळे पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स