शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:24 IST

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही.

(Image Credit : Healthline)

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. उन्हाळ्या डिहायड्रेशनची समस्या होते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलेच असेल पण कधी ओव्हरहाड्रेशन ऐकलंय का? जसं डिहायड्रेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरतं तसंच ओव्हरहायड्रेशनही आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. चला जाणून घेऊ काय आहे ओव्हरहायड्रेशन...

किती पाणी पिणे गरजेचे?

पाण्याची गरज वय आणि शारीरिक श्रमानुसार बदलत राहते. म्हणजे जर तुम्ही असं काही काम करता ज्यात तुम्हाला फार जास्त घाम येतो तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. पण जर असं नसेल तर तुमच्या शरीराला फार जास्त पाण्याची गरज पडणार नाही. पण सामान्य धारणा अशी आहे की, एका चांगलं आरोग्य असलेल्या व्यक्तीने एका दिवसात २ ते ४ लिटर पाणी प्यावं. विशेष स्थिती जसे की, जिम, एक्सरसाइज, जड मेहनत किंवा गरमीमुळे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पण जर सामान्यपणे जर तुम्ही रोज ५ ते ६ लिटर पाणी पित असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर उलटा प्रभाव पडू शकतो. 

(Image Credit : Living-Water)

जास्त पाणी पिणे का धोकादायक?

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. सर्वात मोठी बाब ही आहे की, अनेक लोक जास्त पाणी प्यायल्याने वजन वाढण्यालाही घाबरतात. पण मुळात आपलं वजन तेव्हाच वाढतं जेव्हा शरीरात फॅट जमा होतं. जमा झालेल्या फॅट सेल्समध्ये पाण्याचं प्रमाणही असतं. अशात जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर किडनी पूर्ण पाणी शरीरातून बाहेर काढण्यास सक्षम नसते. शिल्लक राहिलेलं पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बिघडवतं. याने पाणी शरीरात जमा होतं आणि त्यामुळे वजन वाढतं. 

मेंदूला येऊ शकते सूज

द हेल्थ साईटनुसार, एका शोधात असं आढळलं आहे की, शरीरात जास्त प्रमाणात पाणी झाल्यावर सोडियमचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागतं. सोडियमचं प्रमाण कमी झाल्याने मेंदूला सूज येऊ शकते. ही एक गंभीर समस्या होऊ शकते. शोधात असंही आढळलं की, जास्त पाणी प्यायल्याने शरीरात असामान्य रूपाने सोडियम कमी होऊ लागतं, त्यामुळे हायपोट्रिमियाचा धोका वाढतो. सोडियम एकप्रकारचं इलेक्ट्रोलाइट आहे, जे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं. 

का पितात जास्त पाणी?

सामान्यपणे जास्त सोडियम आणि कमी पोटॅशिअमच्या सेवनने फार जास्त तहान लागते. मीठ सोडियमने तयार होतं, त्यामुळे जास्त मीठ खाणाऱ्यांना जास्त तहान लागते. मीठ सेल्समधून पाणी बाहेर काढतं. अशात जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर तुमच्या पेशी मेंदूला लवकर लवकर तहान लागण्याचा संकेत पाठवू लागते. 

लागोपाठ जास्त पाणी सेवन नको

जर एखाद्या दिवशी तुम्ही जास्त पाणी सेवन केलं असेल तर किडनी हळूहळू ते पाणी बाहेर काढण्याचं काम करत असते. २४ तासातच हे जमा झालेलं पाणी शरीराच्या बाहेर निघतं. पण जास्त पाणी पिणे हे तुमची रोजची सवय झाली असेल तर हे पाणी बाहेर काढण्यास किडनीला अडचण येते. याने किडनी फेल होण्याचाही धोका वाढू शकतो. 

(Image Credit : Healthline)

कसं घातक आहे ओव्हरहायड्रेशन

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या होऊ लागते. ओव्हरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. किडनी आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्याचं काम करतात. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर किडनींच्या कामावर ओझं जास्त होतं. ज्यामुळे पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स