शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:24 IST

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही.

(Image Credit : Healthline)

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. उन्हाळ्या डिहायड्रेशनची समस्या होते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलेच असेल पण कधी ओव्हरहाड्रेशन ऐकलंय का? जसं डिहायड्रेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरतं तसंच ओव्हरहायड्रेशनही आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. चला जाणून घेऊ काय आहे ओव्हरहायड्रेशन...

किती पाणी पिणे गरजेचे?

पाण्याची गरज वय आणि शारीरिक श्रमानुसार बदलत राहते. म्हणजे जर तुम्ही असं काही काम करता ज्यात तुम्हाला फार जास्त घाम येतो तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. पण जर असं नसेल तर तुमच्या शरीराला फार जास्त पाण्याची गरज पडणार नाही. पण सामान्य धारणा अशी आहे की, एका चांगलं आरोग्य असलेल्या व्यक्तीने एका दिवसात २ ते ४ लिटर पाणी प्यावं. विशेष स्थिती जसे की, जिम, एक्सरसाइज, जड मेहनत किंवा गरमीमुळे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पण जर सामान्यपणे जर तुम्ही रोज ५ ते ६ लिटर पाणी पित असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर उलटा प्रभाव पडू शकतो. 

(Image Credit : Living-Water)

जास्त पाणी पिणे का धोकादायक?

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. सर्वात मोठी बाब ही आहे की, अनेक लोक जास्त पाणी प्यायल्याने वजन वाढण्यालाही घाबरतात. पण मुळात आपलं वजन तेव्हाच वाढतं जेव्हा शरीरात फॅट जमा होतं. जमा झालेल्या फॅट सेल्समध्ये पाण्याचं प्रमाणही असतं. अशात जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर किडनी पूर्ण पाणी शरीरातून बाहेर काढण्यास सक्षम नसते. शिल्लक राहिलेलं पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बिघडवतं. याने पाणी शरीरात जमा होतं आणि त्यामुळे वजन वाढतं. 

मेंदूला येऊ शकते सूज

द हेल्थ साईटनुसार, एका शोधात असं आढळलं आहे की, शरीरात जास्त प्रमाणात पाणी झाल्यावर सोडियमचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागतं. सोडियमचं प्रमाण कमी झाल्याने मेंदूला सूज येऊ शकते. ही एक गंभीर समस्या होऊ शकते. शोधात असंही आढळलं की, जास्त पाणी प्यायल्याने शरीरात असामान्य रूपाने सोडियम कमी होऊ लागतं, त्यामुळे हायपोट्रिमियाचा धोका वाढतो. सोडियम एकप्रकारचं इलेक्ट्रोलाइट आहे, जे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं. 

का पितात जास्त पाणी?

सामान्यपणे जास्त सोडियम आणि कमी पोटॅशिअमच्या सेवनने फार जास्त तहान लागते. मीठ सोडियमने तयार होतं, त्यामुळे जास्त मीठ खाणाऱ्यांना जास्त तहान लागते. मीठ सेल्समधून पाणी बाहेर काढतं. अशात जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर तुमच्या पेशी मेंदूला लवकर लवकर तहान लागण्याचा संकेत पाठवू लागते. 

लागोपाठ जास्त पाणी सेवन नको

जर एखाद्या दिवशी तुम्ही जास्त पाणी सेवन केलं असेल तर किडनी हळूहळू ते पाणी बाहेर काढण्याचं काम करत असते. २४ तासातच हे जमा झालेलं पाणी शरीराच्या बाहेर निघतं. पण जास्त पाणी पिणे हे तुमची रोजची सवय झाली असेल तर हे पाणी बाहेर काढण्यास किडनीला अडचण येते. याने किडनी फेल होण्याचाही धोका वाढू शकतो. 

(Image Credit : Healthline)

कसं घातक आहे ओव्हरहायड्रेशन

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या होऊ लागते. ओव्हरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. किडनी आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्याचं काम करतात. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर किडनींच्या कामावर ओझं जास्त होतं. ज्यामुळे पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स