शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:58 IST

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.  

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.  खाण्यापिण्याची म्हणजे तुमच्या रोजच्या जेवणाची, नाष्त्याची आणि झोपेची वेळ निश्चीत नसणे हे खुपच कॉमन  आहे. पण तुमच्या याच सवयी तुम्हाला महागात पडू शकतात.एका सुदृढ आणि चांगल्या शरीरासाठी पौष्टीक आहार घेणं फार महत्वाचं असतं.  आहार हा दिवस उगवल्यापासून  रात्री झोपेपर्यंत उर्जा देत असतो.  कारण हाडांना आणि मासपेशींना मजबूत करण्यासाठी आपण काय खातो ते महत्वाचं असतं.  

अनेकदा महिलांना तसंच पुरूषांना घरातील आणि ऑफिसची कामं  संपेपर्यंत उशीर होत असतो. परिणामी जेवायला तसचं झोपायला उशीर होतो. त्यानंतरही असंख्य लोकं जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत मोबाईलचा वापर करत असतात. त्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. पण तुमच्या सवयी जीवघेण्यासुद्धा ठरू शकतात. (हे पण वाचा:वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल)

(image credit- healthline)

अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की  रात्री उशीरापर्यंत काम केल्यामुळे  तुम्हाला हृदयाशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढतं तसंच कॉलेस्ट्रॉल सुध्दा वाढतं. ज्या लोकांना रात्री उशीरापर्यत जेवण्याची सवय असते.  त्यांना या आजारांचा धोका जास्त जाणवतो. रात्री उशीरापर्यंत जागून काम केल्याने किंवा रात्री  उशीरा जेवल्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. त्यामुळे तुमचं वजन वाढतं. (हे पण वाचा:ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल)

कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हद्यावर ताण येत असतो.  त्यामुळे  भविष्यात ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करावी लागत असते. तज्ञांच्यामते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारतशक्ती कमी होण्याचे  कारण तुमची झोप पूर्ण न  होणे  हे असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.  त्यामुळे आजारांपासून लांब राहण्यासाठी रात्री उशीरा जेवणं टाळा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य