शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:58 IST

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.  

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.  खाण्यापिण्याची म्हणजे तुमच्या रोजच्या जेवणाची, नाष्त्याची आणि झोपेची वेळ निश्चीत नसणे हे खुपच कॉमन  आहे. पण तुमच्या याच सवयी तुम्हाला महागात पडू शकतात.एका सुदृढ आणि चांगल्या शरीरासाठी पौष्टीक आहार घेणं फार महत्वाचं असतं.  आहार हा दिवस उगवल्यापासून  रात्री झोपेपर्यंत उर्जा देत असतो.  कारण हाडांना आणि मासपेशींना मजबूत करण्यासाठी आपण काय खातो ते महत्वाचं असतं.  

अनेकदा महिलांना तसंच पुरूषांना घरातील आणि ऑफिसची कामं  संपेपर्यंत उशीर होत असतो. परिणामी जेवायला तसचं झोपायला उशीर होतो. त्यानंतरही असंख्य लोकं जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत मोबाईलचा वापर करत असतात. त्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. पण तुमच्या सवयी जीवघेण्यासुद्धा ठरू शकतात. (हे पण वाचा:वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल)

(image credit- healthline)

अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की  रात्री उशीरापर्यंत काम केल्यामुळे  तुम्हाला हृदयाशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढतं तसंच कॉलेस्ट्रॉल सुध्दा वाढतं. ज्या लोकांना रात्री उशीरापर्यत जेवण्याची सवय असते.  त्यांना या आजारांचा धोका जास्त जाणवतो. रात्री उशीरापर्यंत जागून काम केल्याने किंवा रात्री  उशीरा जेवल्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. त्यामुळे तुमचं वजन वाढतं. (हे पण वाचा:ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल)

कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हद्यावर ताण येत असतो.  त्यामुळे  भविष्यात ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करावी लागत असते. तज्ञांच्यामते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारतशक्ती कमी होण्याचे  कारण तुमची झोप पूर्ण न  होणे  हे असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.  त्यामुळे आजारांपासून लांब राहण्यासाठी रात्री उशीरा जेवणं टाळा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य