शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

गरम आणि मिठाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर दवाखान्याचा रस्ता विसराल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:51 IST

Hot and Salt Water Benefits : अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी आणि फिट राहण्याच्या टीप्स घेऊन आलो आहोत. 

Hot and Salt Water Benefits : पाण्याशिवाय जगणं शक्य हे नाही सर्वांनाच माहीत आहे. पाणी आपली तहान भागवण्यासोबतच शरीराच्या विकासात अनेक महत्वाच्या भूमिकाही बजावतं. पण अलिकडे धावपळीच्या जीवनात, कामाच्या ओझ्यामुळे प्रत्येकाला आरोग्य हेल्दी आणि फिट ठेवणं शक्य होत नाही. अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी आणि फिट राहण्याच्या टीप्स घेऊन आलो आहोत. 

1) ऊर्जा वाढवणं आणि थकवा दूर करणं

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवाणं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते.

2) वजन कमी करण्यात मदत

वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दिवसभर काहीना काही खात रहाणं हे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, त्यासाठी तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी प्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला भूक कमी करण्यास मदत मिळते. 

3) इम्युनिटी सिस्टम होतं मजबूत

तुम्ही जितकं जास्त पाणी पिणार तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहणार. पाण्यामुळे तुमचं इम्युनिटी सिस्टम मजबूत राहतं आणि याने तुम्हाला कॅंसर आणि इतरही रोगांपासून लढण्याची ताकद मिळते. 

4) शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

मिठाचं पाणी पिण्याचे फायदे

1) पचनक्रिया चांगली राहते

मिठाचं पाणी प्यायल्याने तोंडातील लाळ ग्रंथी सक्रीय होतात. त्यामुळे पचनक्रिया संतुलित राहते. 

2) वजन कमी करण्यास मदत

काळं मिठ घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होतात. याने तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने डायबिटीससारखे आजार होण्याची शक्यता कमी असते. 

3) चांगली झोप लागण्यास मदत

मीठ रक्तात कॉर्टिसोल आणि एड्रनिल वाढवण्यासाठी मदत करतं. या दोन्ही गोष्टी हार्मोन्स स्ट्रेससोबत डील करतात. हे हार्मोन्स मॅनेज केल्यास झोप चांगली येते. त्यामुळे जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रोज सकाळी मिठ घातलेलं पाणी सेवन करा.

4) बॅक्टेरियाचा सफाया

मिठाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मिठाचं पाणी अ‍ॅंटी बॅक्टेरिअल सारखं काम करतं. याने तुमच्या शरीरात रोगराई पसरवणारे बॅक्टेरिया मारले जातात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. 

गरम पाणी पिण्याचे फायदे

1) सकाळी लवकर उठून गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलित राहते. जेवण लवकर आणि सहज पचतं.

2) सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचं वजन नियंत्रित राहतं. यामुळे शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.

3) आजकाल वेळेच्याआधीच म्हातारपण येताना बघायला मिळतं. जर तुम्हालाही वयाच्या आधीच म्हातारप नको असेल तर सकाळी उठून रोज गरम पाणी नक्की प्यावे. 

4) रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्तसारख्या समस्याही होत नाहीत.

5) गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य