शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गर्भधारणेपूर्वी आहार असा असावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 6:37 PM

लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात.

(Image Credit : FirstCry Parenting)

प्रिया गुरव

लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात. पण, गर्भधारणा होणं यातही अनेक अडचणी येतात. बदललेली जीवनशैली, खानपान, कामाच्या वेळा या सगळ्यांचा कदाचित परिणाम असू शकतो. पण, गर्भधारणा होण्यासाठी अनेकांना डॉक्टरी इलाज करावे लागतात किंवा गर्भधारणा झाली तरी त्या काळात विविध प्रकारचे त्रास त्या स्त्रीला सहन करावे लागतात.

गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणे असतात.

१) अनियंत्रित वजनवाढ : पतीपत्नी दोघांचीही होणारी वजनवाढ विचार करायला लावणारी आहे. दोघांचेही वजन जर वाढलेले असेल, तर गर्भधारणा होणं किंवा निकोप संतती होणं कठीण असतं. त्यामुळे बाळाचा विचार करताना दोघांनीही वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते.

२) संप्रेरकांचे असंतुलन : हे देखील पतीपत्नी दोघांमध्ये आढळते. पण, गर्भधारणेसाठी आईची संप्रेरके संतुलित असणे अतिशय आवश्यक असतं. आईच्या संतुलित संप्रेरकांवरच गर्भधारणा, बालकाचा जन्म व आईचे दूध या सर्वच बाबी अवलंबून असतात. स्त्रीला जर थायरॉइड असेल, तर अनेकदा गर्भधारणा होणं कठीण होते.

३) रक्तक्षय : रक्तक्षय हा आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे गर्भधारणा झाल्यावर अनेकदा माता आणि बाळ दोघांनाही त्रास संभवतो. अनेकदा कमी वजनाचं आणि अपुऱ्या दिवसाचं बाळ जन्माला येतं. वरील सर्व घटकांमध्ये आहार नियोजनबद्ध आणि योग्य पद्धतीने घेतला, तर चांगला बदल दिसून येऊ शकतो. नुसत्या औषधोपचारांपेक्षा आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे.

- जास्तीतजास्त पोषणमूल्ये आहारात कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. मिश्र डाळी, मिश्र कडधान्य, खिचडी, पालेभाज्या यांचा वापर आपण रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात करू शकतो.

- जास्तीतजास्त पोषणमूल्ये आहारात कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. मिश्र डाळी, मिश्र कडधान्य, खिचडी, पालेभाज्या यांचा वापर आपण रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात करू शकतो.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स