शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

Anxiety समस्येकडे करू नका दुर्लक्ष, घेऊ शकते डिप्रेशन आणि अटॅकचं रूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 10:49 IST

सामान्यपणे आपण एंग्जायटीला तेवढ्या गंभीरतेने घेत नाही, जेवढं घ्यायला पाहिजे. हेच कारण आहे की, तरूणांमध्ये एंग्जायटीचं प्रमाण वाढत आहे.

(Image Credit : CBHS Health Fund)

तुम्ही एंग्झायटीबाबत अनेकदा ऐकलं असेलच. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, याकडे दुर्लक्ष केल्याने डिप्रेशन आणि एंग्जायटी अटॅकचा धोका होऊ शकतो. एंग्जायटी म्हणजे चिंता ही कुणालाही, कोणत्याही गोष्टीमुळे होऊ शकते. काही लोकांना चारचौघात बोलण्याची एंग्जायटी म्हणजे टेन्शन असतं, तर मुलांमध्ये परिक्षेबाबत एंग्जायटी असते.

सामान्यपणे आपण एंग्जायटीला तेवढ्या गंभीरतेने घेत नाही, जेवढं घ्यायला पाहिजे. हेच कारण आहे की, तरूणांमध्ये एंग्जायटीचं प्रमाण वाढत आहे. केवळ तरूणच नाही तर आता तर लहान मुलांमध्येही एंग्जायटीची लक्षणे दिसणे सामान्य बाब झाली आहे. लहान मुलांमधील या लक्षणांना ढोबळमानाने चिंता किंवा उतावळेपणाचं नाव दिलं जातं.

एंग्जायटी अटॅक 

(Image Credit : Mission Harbor Behavioral Health)

एंग्जायटीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर ही स्थिती एंग्जायटी अटॅकचं रूप घेऊ शकते. ही ती स्थिती आहे ज्यात व्यक्तीला सतत भीती असते की, काहीतरी वाईट किंवा चुकीचं घडणार आहे. ही स्थिती पॅनिक अटॅकपेक्षा वेगळी असते. पॅनिक अटॅकची लक्षणे एंग्जायटी अटॅकच्या तुलनेत अधिक घातक असतात. एंग्जायटी अटॅकमध्ये व्यक्तीला सतत चिंका, भीती आणि अस्वस्थता जाणवते. हृदयाची धडधड वाढते आणि श्वास भरून येतो. त्यामुळे एंग्जायटीकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांना संपर्क करून योग्य ते उपचार घ्यावे.

एंग्जायटीची लक्षणे

(Image Credit : The Conversation)

एंग्जायटीने पीडित व्यक्ती टेन्शन आणि भीतीमध्ये तर राहतो, सोबतच ती व्यक्ती दुसऱ्या लोकांपासून दूर राहू लागते. त्याला एकटं राहणं पसंत असतं आणि त्याच गोष्टींबद्दल जास्त विचार करतो ज्या गोष्टींमुळे त्याला दु:खं होतं. श्वास भरून येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे याशिवाय एंग्जायटीने शिकार असलेल्या व्यक्तीला झोप येत नाही आणि ते रात्रभर जागे राहतात. 

काही वेगळी लक्षणे

सतत या लोकांच्या मनात नकारात्मक विचार सुरू असतात.

डोकं दुखतं आणि कोणत्याही कामात लक्ष लागत नाही.

डायरिया होतो आणि अनेक जांभई देऊ लागतात.

तोंड कोरडं पडतं आणि व्यक्ती बेशुद्ध होतो.

एंग्जायटीने ग्रस्त लोकांना काय करावे?

(Image Credit : NPR)

1) जर तुम्ही फार जास्त कॉफी पिण्याचे शौकीन असाल तर प्रमाण कमी करा. जास्त कॉफी प्यायल्याने हार्टबीट वाढतात आणि याने व्यक्तीला नर्व्हस वाटू लागतं. कॉफीचं जास्त सेवन केल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, हातांना घाम येणे, कानात आवाज घुमणे आणि वेगाने हृदय धडधडणे.

२) अनियमित खाणं-पिणं यानेही एंग्जायटीची समस्या गंभीर रूप घेऊ शकते. अनेकजण सकाळचा नाश्ता करत नाहीत किंवा दिवसभरही काही खात नाहीत. काहीच न खाता अनेकजण झोपतात कंवा जंक फूड खाऊन झोपतात. या सर्व सवयी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते आणि सोबत एंग्जायटीचा स्तरही वाढतो. उपाशी राहिल्याने स्ट्रेस लेव्हल वाढते आणि ब्लड शुगरचं प्रमाण कमी होतं. याने एंग्जायटीची समस्या होते.

३) एंग्जायटीने ग्रस्त अनेक लोक रात्री उशीरापर्यंत झोपत नाही आणि तणाव आणखी वाढू देतात. हा वाढलेला तणाव त्यांची राहिलेली झोपही उडवतो. नंतर हा तणाव दिवसाही तुमचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे रात्री जास्त उशीरापर्यंत जागू नका. लाइफस्टाईलमध्ये बदल करा.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealthआरोग्य