नवी दिल्ली : भारतात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रसिद्ध ताज्या विश्लेषणानुसार, गेल्या तीन दशकांत भारतात स्तन कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ५ पटींनी वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय आहार म्हणजेच ‘भाजी-पोळी’ सोडून पाश्चिमात्य ‘जंक फूड’ संस्कृती स्वीकारल्याने हा धोका ४७७.८ टक्क्यांनी वाढल्याचे वास्तव समोर आले.
२.०३ लाख नवे रुग्ण
अहवालानुसार, १९९० च्या तुलनेत २०२३ पर्यंत भारतात स्तन कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सध्या सुमारे २.०३ लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असून, या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या १.०२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
कर्करोगाची प्रकरणे वाढण्यामागची कारणे?
खराब जीवनशैली : अनियमित दिनचर्या आणि आहारातील बदल.शारीरिक निष्क्रियता : व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून काम करणे.व्यसन : अमली पदार्थ सेवन आणि धूम्रपान.उशिरा मातृत्व : उशिरा लग्न आणि उशिरा होणारी मुले.प्रक्रिया केलेले पदार्थ : जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि रेड मीटचे अतिसेवन.लठ्ठपणा : वाढते वजन आणि चरबी.
प्रतिबंध आणि खबरदारी
अहवालात दिलासादायक बाब ही आहे की, जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास कर्करोगाचा धोका २८ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
वेळोवेळी मॅमोग्राफी आणि स्वतःहून तपासणी केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच आजार लक्षात येतो. त्यामुळे वेळीच उपचार मिळतात.
जंक फूड टाळून पोषक आणि नैसर्गिक आहारावर भर द्यावा. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करावा. यामुळे मोठ्या प्रमाणात धोका कमी करता येतो.
Web Summary : Breast cancer cases in India have surged fivefold in three decades, with a 478% increase linked to Western junk food diets. Poor lifestyle, lack of exercise, and processed foods are major contributing factors. Early detection and lifestyle changes can reduce the risk.
Web Summary : भारत में तीन दशकों में स्तन कैंसर के मामलों में पांच गुना वृद्धि हुई है, जिसका कारण पश्चिमी जंक फूड आहार है। खराब जीवनशैली, व्यायाम की कमी और प्रोसेस्ड खाद्य पदार्थ प्रमुख कारण हैं। शुरुआती पहचान और जीवनशैली में बदलाव से खतरा कम हो सकता है।