शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रोजच्या आहारातून 'या' व्हिटॅमिन्सकडे दुर्लक्ष करताहेत भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:35 IST

भारतीयांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे.

भारतीयांच्या खाण्या-पिण्यातून व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे. व्हिटॅमिन ए, सी, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांबाबत उत्तर भारतात फार दुर्लक्ष केले जात आहे. तर दक्षिण भारतात व्हिटॅमिन बी १ ची सर्वात कमतरता दिसून आली. तसेच व्हिटॅमिन बी २ ची कमतरता पश्चिम भारतात आढळून आली. 

डॉयग्नॉस्टिक चेन एसआरएल डॉयग्नॉस्टिकच्या साडे तीन वर्षांच्या ९.५ लाखांपेक्षा अधिक नमुन्यांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष समोर आले आहे. महिला आणि पुरुषांवर आधारित या विश्लेषणात हे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन ए, बी २ आणि बी ६ ची सर्वाधिक कमतरता महिलांमध्ये तर पुरुषांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी १२ ची कमतरता आढळून आली आहे.  

वेगाने होणारं शहरीकरण, बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे भारतीयांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आढळून आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणाने हे स्पष्ट केले आहे की, व्हिटॅमिन ए, सी, बी १, बी ६, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांची ज्याप्रकारची कमतरता आहे त्यातून गंभीर आजार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणातून हे समोर आले आहे की, व्हिटॅमिनची कमतरता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक उत्तर भारतातील लोकांमध्ये आहे. 

या अभ्यासाशी संबंधित डॉ. बी. आर. दास यांनी सांगितले की, 'भारतात चारही भागांमध्ये व्हिटॅमिन सी, बी १, बी २, बी १२ आणि फोलिक अॅसिडती कमतरता असण्याची समस्या ३१ ते ४५ वयांच्या लोकांमध्ये आहे. प्रवास करताना काही खाणे, फास्ट फूड खाणे आणि रोजच्या आहारात पोषक फळे आणि भाज्या नसणे ही याची कारणे असू शकतात. याने आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं'.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स