शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

रोजच्या आहारातून 'या' व्हिटॅमिन्सकडे दुर्लक्ष करताहेत भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:35 IST

भारतीयांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे.

भारतीयांच्या खाण्या-पिण्यातून व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे. व्हिटॅमिन ए, सी, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांबाबत उत्तर भारतात फार दुर्लक्ष केले जात आहे. तर दक्षिण भारतात व्हिटॅमिन बी १ ची सर्वात कमतरता दिसून आली. तसेच व्हिटॅमिन बी २ ची कमतरता पश्चिम भारतात आढळून आली. 

डॉयग्नॉस्टिक चेन एसआरएल डॉयग्नॉस्टिकच्या साडे तीन वर्षांच्या ९.५ लाखांपेक्षा अधिक नमुन्यांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष समोर आले आहे. महिला आणि पुरुषांवर आधारित या विश्लेषणात हे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन ए, बी २ आणि बी ६ ची सर्वाधिक कमतरता महिलांमध्ये तर पुरुषांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी १२ ची कमतरता आढळून आली आहे.  

वेगाने होणारं शहरीकरण, बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे भारतीयांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आढळून आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणाने हे स्पष्ट केले आहे की, व्हिटॅमिन ए, सी, बी १, बी ६, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांची ज्याप्रकारची कमतरता आहे त्यातून गंभीर आजार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणातून हे समोर आले आहे की, व्हिटॅमिनची कमतरता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक उत्तर भारतातील लोकांमध्ये आहे. 

या अभ्यासाशी संबंधित डॉ. बी. आर. दास यांनी सांगितले की, 'भारतात चारही भागांमध्ये व्हिटॅमिन सी, बी १, बी २, बी १२ आणि फोलिक अॅसिडती कमतरता असण्याची समस्या ३१ ते ४५ वयांच्या लोकांमध्ये आहे. प्रवास करताना काही खाणे, फास्ट फूड खाणे आणि रोजच्या आहारात पोषक फळे आणि भाज्या नसणे ही याची कारणे असू शकतात. याने आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं'.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स