शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या आहारातून 'या' व्हिटॅमिन्सकडे दुर्लक्ष करताहेत भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:35 IST

भारतीयांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे.

भारतीयांच्या खाण्या-पिण्यातून व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे. व्हिटॅमिन ए, सी, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांबाबत उत्तर भारतात फार दुर्लक्ष केले जात आहे. तर दक्षिण भारतात व्हिटॅमिन बी १ ची सर्वात कमतरता दिसून आली. तसेच व्हिटॅमिन बी २ ची कमतरता पश्चिम भारतात आढळून आली. 

डॉयग्नॉस्टिक चेन एसआरएल डॉयग्नॉस्टिकच्या साडे तीन वर्षांच्या ९.५ लाखांपेक्षा अधिक नमुन्यांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष समोर आले आहे. महिला आणि पुरुषांवर आधारित या विश्लेषणात हे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन ए, बी २ आणि बी ६ ची सर्वाधिक कमतरता महिलांमध्ये तर पुरुषांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी १२ ची कमतरता आढळून आली आहे.  

वेगाने होणारं शहरीकरण, बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे भारतीयांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आढळून आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणाने हे स्पष्ट केले आहे की, व्हिटॅमिन ए, सी, बी १, बी ६, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांची ज्याप्रकारची कमतरता आहे त्यातून गंभीर आजार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणातून हे समोर आले आहे की, व्हिटॅमिनची कमतरता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक उत्तर भारतातील लोकांमध्ये आहे. 

या अभ्यासाशी संबंधित डॉ. बी. आर. दास यांनी सांगितले की, 'भारतात चारही भागांमध्ये व्हिटॅमिन सी, बी १, बी २, बी १२ आणि फोलिक अॅसिडती कमतरता असण्याची समस्या ३१ ते ४५ वयांच्या लोकांमध्ये आहे. प्रवास करताना काही खाणे, फास्ट फूड खाणे आणि रोजच्या आहारात पोषक फळे आणि भाज्या नसणे ही याची कारणे असू शकतात. याने आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं'.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स