शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जेवण झाल्यावर लगेच 'या' गोष्टी करणं पडू शकतं महागात, तुम्हीही हे करता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:02 IST

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात.

(Image Credit : bestofme.in)

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात. पण या महत्वाच्या गोष्टींची वेळ चुकली तर या उलट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वेगवेगळे आजार लगेच आपल्याला त्यांच्या जाळ्यात घेऊ लागतात. मग हजारो आणि लाखो रूपये हॉस्पिटलमध्ये खर्च करत बसावे लागतात. आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खाण्या-पिण्यापासून दिवसातील सर्वच महत्वाच्या गोष्टी वेळेवर केल्या गेल्या पाहिजे. खासकरून जेवणानंतर लगेच काय करू नये याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील. 

लगेच झोपू नका

अनेक लोक असे असतात ज्यांना जेवण केल्या-केल्या आळस येऊ लागतो आणि ते लगेच झोपतात. पण असं करणं फार नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने तुमच्यात लठ्ठपणा वाढू शकतो आणि तुम्हाला पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.

लगेच फळं खाऊ नका

(Image Credit : dayafterindia.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर फळं खावीत. पण जेवण केल्यावर लगेच फळं खाणं योग्य ठरत नाही. आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच फळं खाल्ल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडा वेळ गेल्यानंतर फळं खावीत, लगेच खाऊ नयेत.

आंघोळ करू नका

(Image Credit : greenenergyofsanantonio.com)

तुम्हाला हे माहीत आहेच की, निरोगी शरीरासाठी वेळेवर आंघोळ करणे आणि जेवण करणे फार गरजेचं असतं. अनेक असेही लोक असतात जे जेवण केल्यानंतरच आंघोळ करतात. पण याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कारण जेवण केल्यानंतर आपल्या पोटात रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपली पचनक्रिया हळू होते. अर्थात याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

चहा घेऊ नका

काही लोक चहाचे फारच शौकीन असतात. त्यांना चहाची सवय लागलेली असते. मग हे लोक जेवण झाल्यावर लगेच चह घेतात. पण जेवण झाल्यावर लगेच चहा घेतल्याने पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला अॅसिडीटीची समस्याही होऊ शकते.

स्मोकिंग करू नका

(Image Credit : medicalnewstoday.com)

आपल्याजवळ असे अनेक लोक असतात जे जेवण केल्यानंतर लगेच स्मोकिंग करतात. असं करणं आरोग्यासाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

लगेच फिरू नका

(Image Credit : lifealth.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर थोडी शतपावली केल्याने अन्न चांगलं पचतं. आयुर्वेदानुसार, असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच चालू नये. थोडावेळ थांबून चालायला हवं. जर लगेच चालायला लागाल तर शरीराला योग्य पोषण मिळत नाही. आणि आपली पचनक्रियाही कमजोर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य