शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जेवण झाल्यावर लगेच 'या' गोष्टी करणं पडू शकतं महागात, तुम्हीही हे करता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:02 IST

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात.

(Image Credit : bestofme.in)

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात. पण या महत्वाच्या गोष्टींची वेळ चुकली तर या उलट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वेगवेगळे आजार लगेच आपल्याला त्यांच्या जाळ्यात घेऊ लागतात. मग हजारो आणि लाखो रूपये हॉस्पिटलमध्ये खर्च करत बसावे लागतात. आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खाण्या-पिण्यापासून दिवसातील सर्वच महत्वाच्या गोष्टी वेळेवर केल्या गेल्या पाहिजे. खासकरून जेवणानंतर लगेच काय करू नये याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील. 

लगेच झोपू नका

अनेक लोक असे असतात ज्यांना जेवण केल्या-केल्या आळस येऊ लागतो आणि ते लगेच झोपतात. पण असं करणं फार नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने तुमच्यात लठ्ठपणा वाढू शकतो आणि तुम्हाला पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.

लगेच फळं खाऊ नका

(Image Credit : dayafterindia.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर फळं खावीत. पण जेवण केल्यावर लगेच फळं खाणं योग्य ठरत नाही. आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच फळं खाल्ल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडा वेळ गेल्यानंतर फळं खावीत, लगेच खाऊ नयेत.

आंघोळ करू नका

(Image Credit : greenenergyofsanantonio.com)

तुम्हाला हे माहीत आहेच की, निरोगी शरीरासाठी वेळेवर आंघोळ करणे आणि जेवण करणे फार गरजेचं असतं. अनेक असेही लोक असतात जे जेवण केल्यानंतरच आंघोळ करतात. पण याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कारण जेवण केल्यानंतर आपल्या पोटात रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपली पचनक्रिया हळू होते. अर्थात याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

चहा घेऊ नका

काही लोक चहाचे फारच शौकीन असतात. त्यांना चहाची सवय लागलेली असते. मग हे लोक जेवण झाल्यावर लगेच चह घेतात. पण जेवण झाल्यावर लगेच चहा घेतल्याने पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला अॅसिडीटीची समस्याही होऊ शकते.

स्मोकिंग करू नका

(Image Credit : medicalnewstoday.com)

आपल्याजवळ असे अनेक लोक असतात जे जेवण केल्यानंतर लगेच स्मोकिंग करतात. असं करणं आरोग्यासाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

लगेच फिरू नका

(Image Credit : lifealth.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर थोडी शतपावली केल्याने अन्न चांगलं पचतं. आयुर्वेदानुसार, असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच चालू नये. थोडावेळ थांबून चालायला हवं. जर लगेच चालायला लागाल तर शरीराला योग्य पोषण मिळत नाही. आणि आपली पचनक्रियाही कमजोर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य