शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जेवण झाल्यावर लगेच 'या' गोष्टी करणं पडू शकतं महागात, तुम्हीही हे करता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:02 IST

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात.

(Image Credit : bestofme.in)

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात. पण या महत्वाच्या गोष्टींची वेळ चुकली तर या उलट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वेगवेगळे आजार लगेच आपल्याला त्यांच्या जाळ्यात घेऊ लागतात. मग हजारो आणि लाखो रूपये हॉस्पिटलमध्ये खर्च करत बसावे लागतात. आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खाण्या-पिण्यापासून दिवसातील सर्वच महत्वाच्या गोष्टी वेळेवर केल्या गेल्या पाहिजे. खासकरून जेवणानंतर लगेच काय करू नये याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील. 

लगेच झोपू नका

अनेक लोक असे असतात ज्यांना जेवण केल्या-केल्या आळस येऊ लागतो आणि ते लगेच झोपतात. पण असं करणं फार नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने तुमच्यात लठ्ठपणा वाढू शकतो आणि तुम्हाला पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.

लगेच फळं खाऊ नका

(Image Credit : dayafterindia.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर फळं खावीत. पण जेवण केल्यावर लगेच फळं खाणं योग्य ठरत नाही. आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच फळं खाल्ल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडा वेळ गेल्यानंतर फळं खावीत, लगेच खाऊ नयेत.

आंघोळ करू नका

(Image Credit : greenenergyofsanantonio.com)

तुम्हाला हे माहीत आहेच की, निरोगी शरीरासाठी वेळेवर आंघोळ करणे आणि जेवण करणे फार गरजेचं असतं. अनेक असेही लोक असतात जे जेवण केल्यानंतरच आंघोळ करतात. पण याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कारण जेवण केल्यानंतर आपल्या पोटात रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपली पचनक्रिया हळू होते. अर्थात याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

चहा घेऊ नका

काही लोक चहाचे फारच शौकीन असतात. त्यांना चहाची सवय लागलेली असते. मग हे लोक जेवण झाल्यावर लगेच चह घेतात. पण जेवण झाल्यावर लगेच चहा घेतल्याने पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला अॅसिडीटीची समस्याही होऊ शकते.

स्मोकिंग करू नका

(Image Credit : medicalnewstoday.com)

आपल्याजवळ असे अनेक लोक असतात जे जेवण केल्यानंतर लगेच स्मोकिंग करतात. असं करणं आरोग्यासाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

लगेच फिरू नका

(Image Credit : lifealth.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर थोडी शतपावली केल्याने अन्न चांगलं पचतं. आयुर्वेदानुसार, असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच चालू नये. थोडावेळ थांबून चालायला हवं. जर लगेच चालायला लागाल तर शरीराला योग्य पोषण मिळत नाही. आणि आपली पचनक्रियाही कमजोर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य