शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Hypertension: २१ कोटींपेक्षा जास्त भारतीयांना उच्च रक्तदाबाने ग्रासले; महाराष्ट्रातील परिस्थिती काय? WHOने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:10 IST

Hypertension in Marathi: भारतात हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

भारतामध्ये उच्च रक्तदाब मोठी समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या नव्या रिपोर्टनुसार, भारतात २१ कोटींपेक्षा जास्त लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. ३० ते ७९ वयोगटातील लोक उच्च रक्तदाबाने ग्रासले गेले असून, याचे प्रमाणे एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के इतके आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ग्लोबल रिपोर्ट ऑन हायपरटेन्शन २०२५ असा रिपोर्ट जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला आहे. रिपोर्टनुसार देशातील फक्त ८.२२ टक्के लोकांनाच माहिती आहे की, त्यांना हा आजार आहे. १७.३ कोटी म्हणजे ८३ टक्के लोकांचा रक्तदाब नियंत्रणात नाहीये. फक्त १७ टक्के लोकांचाच रक्तदाब नियंत्रणात आहे. 

उच्च रक्तदाब का आहे जीवघेणा?

उच्च रक्तदाबाचा परिणाम थेट ह्रदय आणि मेंदूवर होतो. जास्तीचा दबाव टाकला जातो. वेळीच तो नियंत्रणात आणला गेला नाही, तर ह्रदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे, डोळ्यांच्या त्रास किंवा स्मृतिभ्रंश हे आजार होऊ शकतात. 

महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

भारतात या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहेत. २०१८-१९ पासून शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत जेनेरिक औषधी दिली जात आहेत. याच्या औषधींच्या किंमतीवरही निर्बंध घालण्यात आलेली आहेत. खासगी मेडिकल स्टोअरच्या तुलनेत ८० टक्के स्वस्त औषधी सरकारी रुग्णालयात मिळतात. 

आधी १४ टक्के रुग्णांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात होता. आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये ७०-८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सरासरी सिस्टोलिक बीपी १५-१६mmHg कमी झाला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले आहे की, उच्च रक्तदाब हा आजार देशातील आरोग्य योजनांमध्ये समावेश करावा. योग्य पावले उचलली गेली, तर लाखो मृत्यू टाळता येतील आणि आर्थिक ताणही कमी होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hypertension grips 210 million Indians; WHO issues warning on Maharashtra.

Web Summary : Over 210 million Indians suffer from hypertension, says WHO. Many are unaware, uncontrolled. It strains heart, brain, kidneys. Maharashtra sees improvement with affordable medicine access, controlling blood pressure in 70-81% patients.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना