शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आंबा गोड लागला म्हणून सारखा खात असाल तर हे वाचाच, जाणून घ्या एकावेळी किती आंबे खावेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:09 IST

आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात आंबे खाल्यास त्याचे काय परिणाम (What Is The Effect Of Eating Too Much Mango?) होऊ शकतात आणि एकावेळी किती आंबे (How Many Mangoes Can Eat At A Time) खावे याबद्दल माहिती देणार आहोत.

हंगामी फळांचे (Seasonal Fruits in diet) सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा (Mango nutrition value) हे उन्हाळ्यातील आपल्या सर्वांचे आवडते फळ आहे. क्वचितच लोक असे असतील ज्यांना आंबा खाणे आवडत नाही. चवीला उत्तम असणाऱ्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि फायबर (Fiber) भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय प्रथिने (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), फॅट्स (Fats) आणि पोटॅशियम (Potassium) देखील असते. आंब्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated fats) आणि सोडियमचे (Sodium) प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते एक सुपरफ्रुट (Mango Is Known As Superfruit) म्हणून ओळखले जाते.

आंब्याच्या चवीमुळे लोक खूप आंबे खातात. मात्र आंबा हे उन्हाळ्यातील हंगामी फळ असले तरी ते प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात आंबे खाल्यास त्याचे काय परिणाम (What Is The Effect Of Eating Too Much Mango?) होऊ शकतात आणि एकावेळी किती आंबे (How Many Mangoes Can Eat At A Time) खावे याबद्दल माहिती देणार आहोत.

जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे दुष्परिणाम...

- आंब्याचे गुणधर्म उष्ण असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पिंपल्स, येण्याच शक्यता असते.

- कच्चा आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

- जास्त प्रमाणात आंबा खाल्याने पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.

- काही लोकांना आंब्याच्या अतिसेवनामुळे अ‍ॅलर्जी किंवा घसा खवखवण्याची समस्या होऊ शकते. आंब्याचा वरचा भाग व्यवस्थित साफ न केल्यास किंवा आंबा कापताना त्याचे दूध काढले गेले नाही तर यामुळे घसा खवखवण्याची समस्या उद्भवते.

- ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.

- गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.

- प्रमाणापेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने वजन वाढणे आणि मधुमेह या दोन्हींचीही शक्यता संभवते.

- कच्चा आंबा खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. कारण आयुर्वेदानुसार हे मिश्रण योग्य नाही.

- रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्याने तुमच्या शरीरास ते अपायकारक ठरू शकतात.

प्रमाणात खावा आंबाआंबा हे एक उष्ण फळ आहे. त्यामुळे तुम्ही आंब्याचे प्रमाणात सेवन केले तर यामुळे काहीही नुकसान होत नाही. मात्र आंबा खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, तसेच त्वचेवर अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे एका दिवसात 2 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये. तसेच आंबे खाण्यापूर्वी ते किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे आंब्याची उष्णता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आंबा कोणत्या वेळी खावा असाही प्रश्न अनेक जणांना पडतो. तर आंबा खाण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याची वेळ. यावेळी आंबा खाल्ल्याने शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. कारण आंबा आपल्या शरीरातील क्षार भरून काढतो आणि दिवसभर आपल्याला उत्साही राहण्यास मदत करतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स