शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लॉकडाऊनमुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर 'असा' होत आहे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 14:27 IST

कधीही न उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना अनेकांना मानसिक आजारांचे शिकार व्हावं लागत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या जीवनात खूप बदल घडून आला आहे. लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या अनेकांना ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे.  आपली नोकरी, व्यवसाय, आर्थीक गोष्टी, रिलेशनशिप याबाबतीत विचार करून अनेकांना नैराश्य आले आहे.  एकंदरीच कधीही न उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना अनेकांना मानसिक आजारांचे शिकार व्हावं लागत आहे.

यात महिलांचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान घरातील सगळे सदस्य एकत्र असल्यामुळे अनेकांच्या घरी आनंद आहे तर काहींना याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे.  रिसर्चमधून दिसूनआले की, कोरोनाच्या महामारीमुळे सर्वाधिक महिला या घरगुती हिंसेच्या शिकार होत आहेत.

फक्त भारतातच नाही तर जगभरातील महिलांना घरगुती हिसेंला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमध्ये पुरूषांचं घरी असणं, आर्थीक संकटं, अपेक्षा पूर्ण करणं यांमुळे काही महिलांना लॉकडाऊनच्या दिवसात घरी राहणं कठीण वाटत आहे.  ज्या पुरुषांना मद्यपान करण्याची सवय आहे. त्यांना दारू न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड, राग, हिंसक वृत्ती याचा त्रास घरातील महिलांना होत आहे. कारण अनेक ठिकाणी स्वतःचं फ्रस्टेशन काढण्यासाठी पुरुष महिलांना शिवीगाळ करत आहेत तर कधी मारहाण सुद्धा करत आहेत.

दुसरीकडे घरातील इतर सदस्यांच्या महिलांकडून खूपच अपेक्षा असतात. नेहमी खाण्यापिण्यासाठी काहीतरी वेगळं तयार करण्याचा आग्रह केला जातो. अशात कोणाकडूनही मदतीचा हात मिळत नाही. त्यामुळे कौटुंबिक मतभेद होतात. त्यामुळे महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. अशा स्थितीत महिलांना थकवा येणं, एकटेपणा, रक्तदाबाच्या समस्या, भूक न लागणं, कामात लक्ष नसणं, एंग्जाइटी डिसॉर्डर, ट्रॉमा यांसारख्या शारीरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना विषाणूंशी लढण्याासाठी मानवी शरीर कधीपर्यंत तयार होणार? जाणून घ्या)

उपाय

या समस्यांवर उपाय म्हणून महिलांनी आपल्या घरच्यांशी शांतपणे चर्चा करायला हवी. त्यामुळे कौटुंबिक मतभेद कमी होण्यास मदत होईल.

घरातील काम सदस्यांमध्ये वाटून घ्यायला हवीत जेणेकरून कामाचा ताण येणार नाही. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं.

व्यायाम, मेडिटेशन आणि झोप यांकडे लक्ष द्यायला हवं.  जेणेकरून नेहमी ताजेतवाने वाटेल.

आपल्या मित्र मैत्रिणींशी फोन करून बोला. तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींकडे आपलं मन मोकळं करू शकता. त्यामुळे नैराश्य येणार नाही. 

(हे पण वाचा-तुमच्यामुळे तुमची मुलंही होऊ शकतात थॅलेसेमियाची शिकार; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य