शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

थंडीत ब्लड प्रेशर हाय होत असेल तर वेळीच करा 'हे' उपाय, अन्यथा निर्माण होईल मृत्यूचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:57 IST

हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

पूर्वी उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा फक्त वृद्धांना होणारा आजार समजला जायचा; मात्र गेल्या काही वर्षांत हानिकारक जीवनशैलीमुळे तरुणांनाही उच्च रक्तदाबाचा विकार होऊ लागला आहे. उच्च रक्तदाब व्यक्तीस हळूहळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो. म्हणूनच या विकाराला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातल्या नॉर्मल रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब होय. अनेकदा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळेवर उपचार न केल्याने हृदयविकार होऊ शकतो. जीवनपद्धती, राहणीमान, खाणं-पिणं आदींच्या वाईट सवयी, मद्यपान, लठ्ठपणा आणि ताणतणाव ही उच्च रक्तदाबाची कारणं आहेत. त्यामुळे आपला रक्तदाब नियमितपणे तपासणं आणि तो नियंत्रित राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात आल्याचा (Ginger) वापर करणं उपयुक्त ठरतं. आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मिठाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तो जेवणाचा अविभाज्य घटक आहे; मात्र ते प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाल्लं गेलं, तर शरीरासाठी त्रासदायक असतं. हिवाळ्यात उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल, तर आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणात मिठाचं प्रमाण वाढलं तर रक्तदाब वाढण्यासह आणखीही काही त्रास होऊ शकतात.

जंक फूड आणि तेलकट अन्न खाणं टाळणं केव्हाही चांगलं. तसंच धूम्रपान आणि मद्यपान करणंही शरीरासाठी हानिकारक आहे. या वाईट सवयींमुळे रक्तदाब वाढतो. आरामदायी जीवनशैली आणि लठ्ठपणा यांमुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे शारीरिक हालचाल वाढली तर आपला रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. जीवनशैली निरोगी असेल, तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्यामुळे दररोज व्यायाम करावा किंवा दररोज ३० मिनिटं चालावं. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभर शारीरिक हालचाली सुरू ठेवणं आवश्यक आहे.

वाढलेलं वजन अनेक रोगांना निमंत्रण देतं. लठ्ठपणामुळे (Fat) अनेक आजार होतात. वजन जास्त वाढलं, तर उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नॉर्मल राखण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, isometric handgrip strengtheners ने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. याद्वारे आठ आठवड्यांत रक्तदाब 8 ते 10 mmHg कमी होऊ शकतो; पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करावा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं. असं केल्यास दीर्घायुषी होण्यास नक्की मदत होऊ शकेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स