शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

थंडीत ब्लड प्रेशर हाय होत असेल तर वेळीच करा 'हे' उपाय, अन्यथा निर्माण होईल मृत्यूचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:57 IST

हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

पूर्वी उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा फक्त वृद्धांना होणारा आजार समजला जायचा; मात्र गेल्या काही वर्षांत हानिकारक जीवनशैलीमुळे तरुणांनाही उच्च रक्तदाबाचा विकार होऊ लागला आहे. उच्च रक्तदाब व्यक्तीस हळूहळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो. म्हणूनच या विकाराला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातल्या नॉर्मल रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब होय. अनेकदा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळेवर उपचार न केल्याने हृदयविकार होऊ शकतो. जीवनपद्धती, राहणीमान, खाणं-पिणं आदींच्या वाईट सवयी, मद्यपान, लठ्ठपणा आणि ताणतणाव ही उच्च रक्तदाबाची कारणं आहेत. त्यामुळे आपला रक्तदाब नियमितपणे तपासणं आणि तो नियंत्रित राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात आल्याचा (Ginger) वापर करणं उपयुक्त ठरतं. आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मिठाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तो जेवणाचा अविभाज्य घटक आहे; मात्र ते प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाल्लं गेलं, तर शरीरासाठी त्रासदायक असतं. हिवाळ्यात उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल, तर आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणात मिठाचं प्रमाण वाढलं तर रक्तदाब वाढण्यासह आणखीही काही त्रास होऊ शकतात.

जंक फूड आणि तेलकट अन्न खाणं टाळणं केव्हाही चांगलं. तसंच धूम्रपान आणि मद्यपान करणंही शरीरासाठी हानिकारक आहे. या वाईट सवयींमुळे रक्तदाब वाढतो. आरामदायी जीवनशैली आणि लठ्ठपणा यांमुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे शारीरिक हालचाल वाढली तर आपला रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. जीवनशैली निरोगी असेल, तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्यामुळे दररोज व्यायाम करावा किंवा दररोज ३० मिनिटं चालावं. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभर शारीरिक हालचाली सुरू ठेवणं आवश्यक आहे.

वाढलेलं वजन अनेक रोगांना निमंत्रण देतं. लठ्ठपणामुळे (Fat) अनेक आजार होतात. वजन जास्त वाढलं, तर उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नॉर्मल राखण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, isometric handgrip strengtheners ने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. याद्वारे आठ आठवड्यांत रक्तदाब 8 ते 10 mmHg कमी होऊ शकतो; पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करावा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं. असं केल्यास दीर्घायुषी होण्यास नक्की मदत होऊ शकेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स