शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री काहीच न खाता झोपल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या फॅक्ट्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 16:12 IST

Weight Loss : जे लोक नेहमी अनोशा पोटी झोपतात त्यांच्या शरीरात अनेकप्रकारच्या व्हिटॅमिन्सची कमतरता होते आणि ऊर्जा कमी होण्याची समस्याही होते.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी काही लोक रात्री अनोशा पोटीच झोपतात. ही सवय अनेकांमध्ये पाहिली जाते. ही सवय अशा लोकांमध्ये अधिक आढळते जे लोक कामांमध्ये फार व्यस्त असतात. काही लोकांना तर वजन कमी करण्याची चिंता असते, त्यामुळे ते रात्री जेवण करत नाहीत. पण असं करून फायदा नाही तर नुकसानच होतं. त्यामुळे याबाबत योग्य माहिती असणं गरजेचं आहे. कारण उपाशी झोपणं फारच घातक आहे. चला जाणून घेऊ असं करून होणाऱ्या नुकसानांबाबत... 

ऊर्जेचा स्तर होतो कमी

जे लोक नेहमी अनोशा पोटी झोपतात त्यांच्या शरीरात अनेकप्रकारच्या व्हिटॅमिन्सची कमतरता होते आणि ऊर्जा कमी होण्याची समस्याही होते. रात्री काहीच न खाता झोपले तर दुसऱ्या दिवशी खूप जास्त थकवा जाणवतो आणि शरीर कमजोर होऊ लागतं. उपाशा पोटी झोपण्यापेक्षा रात्री थोडं दूध प्यावं. 

मेटाबॉलिज्म होतं कमजोर

तुम्ही नेहमीच अनोशा पोटी झोपत असाल तुम्हाला वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण अनोशा पोटी झोपल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म कमजोर होऊ लागतं. मेटाबॉलिज्म कमजोर झाल्यास वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. ज्यांचं मेटाबॉलिज्म कमजोर असतं, त्यांना डायबिटीस आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

चांगली झोप येणार नाही

जर तुम्ही अनोशा पोटी झोपत असाल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. उपाशी झोपल्याने अनेकांना अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्या होऊ लागते. रात्री जर चांगली झोप हवी असेल तर जेवण करायलाच पाहिजे. तसेच रात्री पुरेशी आणि चांगली झोप झाली नाही तर व्यक्तीचा स्ट्रेस वाढू लागतो आणि वेगवेगळे आजारही होतात. 

वजन वाढण्याचा धोका

रात्री काहीच न खाता झोपल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक जास्त असते. काही लोकांना वाटतं की, रात्री जेवण केलं नाही तर वजन कमी होईल. पण यात काहीच तथ्य नाही. जे रात्री काहीच न खाता झोपतात, त्यांचं वजन वाढू लागतं. जर तुम्हाला वजनाची भीती असेल तर रात्री हलकं काहीतरी खावं.

पोषक तत्व आणि व्हिटॅमिनची कमतरता

जर तुम्ही नेहमीच रात्री जेवण करत नसाल किंवा काहीच न खाता झोपत असाल तर तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. पोषक तत्वांसोबतच शरीरात व्हिटॅमिनची सुद्धा कमतरता होऊ लागते. या दोन्ही गोष्टी शरीरातून कमी झाल्या तर व्यक्ती वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. जर आजार टाळायचे असतील रात्री उपाशी झोपू नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स