शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पावसाळा एन्जॉय करायचा की आजारी पडायचं? साधे सोपे नियम फॉलो करा; राहा फिट अ‍ॅंड फाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 15:07 IST

आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी.

Monsoon health Tips : यंदाचा उन्हाळा इतका तापला की आपण सारेच वाट पाहतो आहोत की पाऊस कधी येईल! सूर्य अक्षरश: आग ओकत होता त्याने संपूर्ण महाराष्ट्र तापला. मान्सून दरवर्षी येतो तो आनंदाच्या धारा सोबत घेऊन येतो. सगळं अवतीभोवतीचं जग क्षणात बदलून जातं. हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरेला पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. पण हे बदल घडतात आणि त्यासोबतच बदलते आपली तब्येत ! 

आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी. स्वतःसह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. 

सोपे साधे नियम-

सगळ्यांना हवाहवासा वाटणाऱ्या या ऋतुमध्ये आजारपण आपल्यापासून चार हात लांब राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

१)  पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न खा. शक्यतो गरम अन्नपदार्थ खावेत. 

२) बाहेर रस्त्यावरचं, हॉटेलातलं खाणं बंद करा. खायची वेळ आलीच तर गरम सूपसारखे पदार्थ खाण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. 

३) शक्यतो तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नका.

४)  पचायला जड पदार्थ म्हणजे उसळ खाणं कमी करा. पचनशक्ती कमी असेल, वारंवार पित्त होत असेल तर उसळ न खाणंच योग्य.

५) विशेषत: पालेभाज्या खाणं पावसाळ्यात टाळावं. ज्यांचं पोट लवकर बिघडतं त्यांनी पालेभाज्या विशेषतः पालक खाणं टाळलेलंच बरं.

६) पाऊस म्हणजे वडे, भजी हे पदार्थ आवडीचे होतात. एखाद्यावेळी खाण्यात गैर काही नाही पण बेसनाचे, तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पोट बिघडणारच त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. 

७)  ठेचे, मिरच्या, खूप तिखट झणझणीत न खाणंच बरं.

८) रोज सायंकाळी लवकर जेवा, हलकं जेवा म्हणजे पोटाचे त्रास होण्याचा धोका कमी होईल.

९) हायजिन सांभाळा, पावसाळ्यात सर्वप्रकारची स्वच्छता सांभाळा. घरात साचलेलं पाणी असेल तर मलेरियासहडेंग्यूचा धोका वाढतो.

१०)  लहान मुलं-वृद्ध यांच्या आहाराची काळजी घेताना पौष्टिक म्हणून पचायला जड पदार्थ, सुकामेव्याचे, दुधाचे प्रमाण यासंबंधित डॉक्टरांशी बोलून ठरवा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊस