शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Excessive Salt Intake: भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 10:12 IST

या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ताजा अहवालामुळे आपल्या जेवणाची चव कमी होऊ शकते. WHO च्या या अहवालानुसार, जगभरात जवळपास 18 लाख 90 हजार लोक मिठाच्या (Salt) अधिक सेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. या अहवालानुसार, जगातील केवळ 3 टक्के लोकच मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करत आहेत.

गरजेपेक्षा अधिक मिठाचे सेवन जीवघेणे -या अहवालानुसार, आवश्यकतेपेक्षा अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर 10.8 ग्रॅम एवढा आहे. तर WHO ने प्रति व्यक्ती मिठाच्या वापराची कमाल मर्यादा 5 ग्रॅम एवढी निश्चित केली आहे. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकत, 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी हे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षाही कमी करायला हवे आणि लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी असावे, शी शिफारस WHO ने केली आहे. हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी केले जाऊ शकतात -WHO नुसार, जर मिठाचे प्रमाण कमी करता आले तर जगभरात दर वर्षी हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी केले जाऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, मिठाचा वापर कमी केलास, 2025 पर्यंत 22 लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि 2030 पर्यंत जवळपास 70 लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. जे सध्या अधिक मिठाच्या सेवनामुळे हृदयरोगी बनत चालले आहेत, असा WHO चा अंदाज आहे. अर्थात सध्या होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.

भारताला मिळाले असे रेटिंग - या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर 1 ते 4 दरम्यान आहे. 1 सबसे म्हणजे सर्वात कमी आणि 4 म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. 1 मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. 2 स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे. भारताचा स्कोर दोन आहे. 3 स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 4 स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले. 

WHO चा इशारा - WHO नुसार, भारतात पाकीट बंद अन्ना वर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक  मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही. मग, पॅकेज्ड फूड मगते चिप्स असोत अथवा कुठलाही पदार्थ, त्यात प्रमाणापेक्षा अधिक मिठ टाकले जाते. मिठ एक एडिक्टिव अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. तसेच जे अन्न अधिक चटपटीत असते, त्याची सवय फार लवकर लागते. याच धारणेने बाजारात अधिक चटपटीत मसाल्यांचे चिप्स, नमकीन आणि बिस्किटांची विक्री केली जाते.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतfoodअन्नHealthआरोग्यHeart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटका