शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 11:43 IST

रोज भात जास्त प्रमाणात खाल्यानं तुम्ही जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकता.

भारतात गव्हानंतर सगळ्यात जास्त वापर तांदळांचा केला जातो.  वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी भाताचा वापर केला जातो.  रोजच्या  जेवणात डाळ भात, मसालेभात, बिर्यानी, खीर, पुलाव किंवा इतर पदार्थांमध्ये तांदळाचा वापर सर्वाधिक केला जातो. भात खाल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. रोजच्या जीवनाचा भाग म्हणून आहारात तांदळाचा समावेश केला जातो.  पुर्वीच्या काळी रोज भात खाण्याची सवय असणं हे ठिक होतं. सध्याची जीवनशैली पाहता  रोज भात जास्त प्रमाणात खाल्यानं तुम्ही जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकता. भात खाल्यानं शरीरातील अवयवांवर कसा परिणाम होतो. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

भात आपल्या रोजच्या जीवनाच भाग आहे. आरोग्याला भाताच्या सेवनानं अनेक फायदे होत असेल तरी जास्त प्रमाणात खाणं शरीरारासाठी नुकसानकारक ठरू शकतं. देशभरात डायबिटिस आणि  हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. हृदयविकाराचे  आणि डायबिटिसच्या रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. 

तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शारीरिक स्वरुपात एक्टिव्ह राहता येत नाही. शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. पूर्वीच्याकाळी वाहतुकीची साधनं नसल्यामुळे लोक  कित्येक किलोमीटर पायी चालत जायचे. सध्या तुलनेने हालचाल फारशी होत नाही. त्यामुळे हृदयाचे आजार, कॉलेस्ट्रॉल वाढणं अशा समस्या उद्भवण्याचा शक्यता असते.

मॅनचेस्टर आणि सलफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात दिलेल्या माहितीनुसार ज्या जागेवर शेतकरी भाताची शेत करतात त्या शेतीत आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. पूरस्थिती उद्भवल्यास आर्सेनिकचं प्रमाण वाढतं. आर्सेनिकमुळे इतर टॉक्सिन्ससोबत शरीरात  कार्डीओवॅस्क्यूलर आजार पसण्याचा धोका वाढतो.  रोज भात खात असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढते.  अशात  धुम्रपान केल्यानं हद्यरोग होण्याची संभावना जास्त असते. त्यासाठी  भाताचं सेवन करत असताना प्रमाणात करणं शरीराला चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

शिळा भात खात असाल तर जाणून घ्या नुकसान आणि फायदे

फर्मेंटेड प्रक्रिया शॉर्ट चेन फॅटी एसिड्स निर्माण करातात. त्यामुळे शरीरातील  दोन हार्मोन्स सक्रिय असतात, ग्लूकागन आणि पेप्टईट  जो तुमच्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो,  पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लठ्ठपणाविरोधक असलेल्या हार्मोन्सचे काम केले जाते, आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर असते, कॉलेस्टॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शिळ्या भाताचे सेवन फायदेशीर ठरत असते.

शिळा आणि पुन्हा गरम केल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटदुखी, उलटी होणे,  जुलाब होणे, अपचनाचा त्रास अशा समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.  बेसिलस सेरेस हे सर्वसाधारणपणे मातीत तयार होणारा एक विषाणू आहे जो भातासुद्धा काहीवेळा तयार होत असतो. जो कच्च्या आणि शिळ्या भाताला दुषित करत असतो.  शिळ्या भाताचे सेवन वारंवार केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा धोका असतो. हा त्रास लहानांनाच नाही तर महिलांना आणि पुरूषांना  सुद्धा होत असतो.

हे पण वाचा-

कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा

रोज बडीशोप घातलेलं दूध प्याल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल

डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य