शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घाईघाईने खाल्ल्याने जाऊ शकतो जीव, जेवण करताना फॉलो करा आयुर्वेदातील हे ३ नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 11:06 IST

आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं.

हैदराबादमधील एका शाळेत दुपारचं जेवण करताना एका ११ वर्षीय मुलाचा वेदनादायी मृत्यू झाला. असं सांगण्यात आलं की, सहाव्या वर्गातील या विद्यार्थ्याने घाईघाईने एकत्र तीन पुऱ्या खाल्ल्या, ज्यामुळे त्याचा गळा पूर्णपणे चोक झाला. श्वास गुदमरल्याने त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथून त्याला सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेवरून आपल्याला हे समजतं की, जेवण करताना घाई करणं आपल्यासाठी किती घातक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं. अशात जेवण करताना आयुर्वेदातील तीन नियम नेमही फॉलो केले पाहिजे. 

१) शांतपणे बसून जेवावे

आयुर्वेदात जेवण करण्याला एक पवित्र क्रिया मानलं जातं. जेवण करताना नेहमीच शांत वातावरणात बसायला हवं. घाईघाईने खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचन होत नाही. ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि इतरही पोटासंबंधी समस्या होतात.

२) छोटे छोटे घास चावून खा

आयुर्वेदात सांगितलं आहे की, अन्न योग्यपणे बारीक चावणं फार गरजेचं आहे. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खायला हवा. जेणेकरून चांगलं पचन व्हावं. घाईघाईने खाल्लेलं अन्न घशात अडकू शकतं किंवा पचन तंत्रावर दबाव टाकू शकतं. 

३) जेवणावर लक्ष केंद्रीत करा

जेवण करताना टीव्ही बघणे, फोन बघणे किंवा इतर काही करणं चुकीचं आहे. याने पचनक्रियेवर वाईट प्रभाव पडतो. जेवण करतान केवळ जेवणावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तेव्हाच ते अन्न शरीराला लागतं. त्यातील पोषण मिळतात.

आणखी काही टिप्स

आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते. आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर साधारण 30 मिनिटांनी पाणी प्यावे. याने पचनक्रिया व्यवस्थित होते.

हैदराबादमधील घटना गंभीर इशारा आहे की, आपण आपल्या आणि मुलांच्या जेवणाच्या पद्धतीवर लक्ष द्यावं. वरील काही सोपे नियम फॉलो केले तर आरोग्यही चांगलं राहतं आणि जीवाला धोकाही होणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स