शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

घाईघाईने खाल्ल्याने जाऊ शकतो जीव, जेवण करताना फॉलो करा आयुर्वेदातील हे ३ नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 11:06 IST

आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं.

हैदराबादमधील एका शाळेत दुपारचं जेवण करताना एका ११ वर्षीय मुलाचा वेदनादायी मृत्यू झाला. असं सांगण्यात आलं की, सहाव्या वर्गातील या विद्यार्थ्याने घाईघाईने एकत्र तीन पुऱ्या खाल्ल्या, ज्यामुळे त्याचा गळा पूर्णपणे चोक झाला. श्वास गुदमरल्याने त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथून त्याला सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेवरून आपल्याला हे समजतं की, जेवण करताना घाई करणं आपल्यासाठी किती घातक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं. अशात जेवण करताना आयुर्वेदातील तीन नियम नेमही फॉलो केले पाहिजे. 

१) शांतपणे बसून जेवावे

आयुर्वेदात जेवण करण्याला एक पवित्र क्रिया मानलं जातं. जेवण करताना नेहमीच शांत वातावरणात बसायला हवं. घाईघाईने खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचन होत नाही. ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि इतरही पोटासंबंधी समस्या होतात.

२) छोटे छोटे घास चावून खा

आयुर्वेदात सांगितलं आहे की, अन्न योग्यपणे बारीक चावणं फार गरजेचं आहे. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खायला हवा. जेणेकरून चांगलं पचन व्हावं. घाईघाईने खाल्लेलं अन्न घशात अडकू शकतं किंवा पचन तंत्रावर दबाव टाकू शकतं. 

३) जेवणावर लक्ष केंद्रीत करा

जेवण करताना टीव्ही बघणे, फोन बघणे किंवा इतर काही करणं चुकीचं आहे. याने पचनक्रियेवर वाईट प्रभाव पडतो. जेवण करतान केवळ जेवणावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तेव्हाच ते अन्न शरीराला लागतं. त्यातील पोषण मिळतात.

आणखी काही टिप्स

आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते. आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर साधारण 30 मिनिटांनी पाणी प्यावे. याने पचनक्रिया व्यवस्थित होते.

हैदराबादमधील घटना गंभीर इशारा आहे की, आपण आपल्या आणि मुलांच्या जेवणाच्या पद्धतीवर लक्ष द्यावं. वरील काही सोपे नियम फॉलो केले तर आरोग्यही चांगलं राहतं आणि जीवाला धोकाही होणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स