शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

झटपट वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 13:12 IST

झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून कंटाळा आलाय का? मग इतर उपायांसोबतच खाण्या-पिण्याच्या वेळाही पाळणं ठरतं आवश्यक.

झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून कंटाळा आलाय का? मग इतर उपायांसोबतच खाण्या-पिण्याच्या वेळाही पाळणं ठरतं आवश्यक. जर तुम्ही योग्य वेळी डाएट घेत नसाल किंवा पाणी पित नसाल तर वजन कमी करण्याचे तुमचे सर्व उपाय व्यर्थ ठरतील. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं की, ज्या व्यक्ती पाणी पिण्याच्या वेळा पाळत असतील, त्यांचं वजन कमी होण्यास फायदा होतो. तसेच ज्या व्यक्ती पाणी पिण्याच्यावेळा पाळत नाहीत, त्यांची वजन कमी करण्याची प्रक्रिया फार संथ गतीने होते. 

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे विशेष योगदान असते. ही गोष्ट आपल्यापैकी सर्वचजणांना माहीत आहे. पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ही बाब लक्षात घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण जर पाणी पिण्याची वेळ योग्य असेल तर झटपट वजन कमी करण्यास मदत होते. 

झटपट वजन कमी करण्यासाठी कधी प्याल पाणी? 

जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला जेवण्याआधी 30 मिनिटं कमीत कमी अर्धा लीटर पाणी पिणं आवश्यक ठरतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते. 

पाणी पिण्याची वेळ पाळणं का आहे आवश्यक? 

यावर अनेक संशोधनं करण्याक आली आहेत. त्यातून सिद्ध झाल्यानुसार, जर तुम्ही काहीही खाण्याआधी पाणी पित असाल तर तुम्ही जास्त जेवणं टाळता. जेव्हा आपल्याला तहान लागते, ती आपल्या शरीराची भूक असते. जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा शरीर पाण्यामार्फत शरीराच्या गरजा पूर्ण करतं. ज्यामुळे जेव्हा तुम्ही जेवता, तेव्हा जास्त जेवण करण्यापासून दूर राहाता. 

Obesity जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्ती जेवणाअगोदर जवळपास अर्धा लीटर पाणी पितात. त्या 12 आठवड्यांमध्ये कमीत कमी 1.5 किलोपर्यंत आपलं वजन कमी करतात. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी पाणी का ठरतं महत्त्वपूर्ण? 

शरीरामध्ये जेव्हा अतिरिक्त फॅट्स जमा होतात. तेव्हा या गोष्टीला लठ्ठपणा म्हणतात. जगभरात सर्वात जास्त लठ्ठपणा हा पोटाच्या चरबीचा असतो. या समस्येचं मुख्य कारण आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि एक्सरसाइज न करणं. 

परंतु, जेव्ह तुम्ही लठ्ठपणा कमी करण्याचा पर्यत्न करत असाल, तेव्हा डाएट वेळेवर घ्या. अनेक डाएट एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, हेल्दी डाएट तेव्हाच फायदेशीर ठरते. जेव्हा ते योग्य वेळी घेतलं जातं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार