शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 11:28 IST

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत.

(Image Credit : HealthyWomen)

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत. याचं कारण तरूणांमध्ये वाढती इनफर्टिलिटीची समस्या. कधी कधी तर ही समस्या इतकी वाढते की, लोकांना पत्ताही लागत नाही. तसेच एक सामान्य धारणा अशीही आहे की, वय जास्त झाल्यावर लग्न केल्यास इनफर्टिलिटीचा धोका अधिक वाढतो. चला जाणून घेऊ याबाबत आणखी माहिती.

हैराण करणारी आकडेवारी

thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार, बाळ होण्यास अडचण येण्याची समस्या म्हणजेच इन्फ्रर्टिलिटीची समस्या गेल्या काही वर्षांमध्ये फार वाढली आहे. एका सर्व्हेनुसार, भारतात जवळपास २ कोटी ७५ लाखांपेक्षा अधिक कपल्स इन्फर्टिलिटीचे शिकार आहेत. म्हणजे दर १० पैकी १ कपल लग्नानंतर बाळा जन्म देण्यात सक्षम नाहीये. याबाबत लोकांमध्ये अनेक चुकीच्या धारणा असतात. पण तज्ज्ञ मानतात की, जास्तीत जास्त लोकांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या ही त्यांच्या चुकीच्या सवयींमुळे येते.

जास्त वयात लग्न करणे

आजकालची तरूणी पिढी करिअर सेट झाल्यावर आणि आर्थिक रूपाने सक्षम झाल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतात. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त तरूण-तरूणी ३० ते ३२ वयादरम्यान लग्न करू इच्छितात. तसेच लग्नानंतरही काही वर्ष त्यांना मुल होऊ द्यायचं नसतं. तज्ज्ञ यावर सांगतात की, ३५ वयानंतर महिलांना आई होण्यासाठी सामान्यांपेक्षा अधिक अडचणी येतात. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये नॉर्मल डिलीव्हरीऐवजी ऑपरेशन करावं लागतं. अनेक जोडप्यांमध्ये शुक्राणूंची क्वॉलिटी खराब होते. त्यामुळे त्यांना अडचणी येतात.दुसरं कारण जे आजकाल जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये पाहिले जातात ते म्हणजे फायब्रायड तयार होणं, एन्डोमॅट्रियमशी संबंधित समस्या. वाढत्या वयात हायपरटेंशनसारख्य दुसऱ्या समस्याही होतात आणि याकारणाने महिलांची फर्टिलिटी प्रभावित होते, असे सांगितले जाते. 

स्पर्म क्वॉलिटी

आजकाल कमी वयात सिगारेट, मद्यसेवन, गुटखा आणि वेगवेगळे ड्रग्स पदार्थ सेवन करण्याची सवय काही तरूण-तरूणींमध्ये वाढली आहे. या सवयींमुळे वीर्याची गुणवत्ता खराब होऊ लागते आणि स्पर्म काउंट कमी होतं. याने होणाऱ्या बाळावर आनुवांशिक रूपाने बदलही होऊ शकतात. याचप्रमाणे अल्कोहोल सुद्धा टेस्टोस्टेरॉनचं उत्पादनही कमी होतं. 

कामाचा वाढता ताण

आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रात काम आणि यशाचं दबाव आधीपेक्षा अधिक वाढला आहे. याकारणाने लोकांना ओव्हर टाइम, नाइट शिफ्ट किंवा घरी काम करावं लागतं. कामासोबतच शरीरासाठी आरामही गरजेचा आहे. पण त्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाहीये. लोक एक्सरसाइजही करत नाही आणि खाण्या-पिण्याकडेही त्यांचं लक्ष नसतं. याने हळूहळू व्यक्तीच्या स्पर्मची क्वॉलिटी खराब होते असं सांगितलं जातं. 

(टिप : वरील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. केवळ माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या माहितीकडे उपाय किंवा उपचार म्हणून बघू नका. तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealth Tipsहेल्थ टिप्स