शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:56 IST

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा एक चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...?

बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठले की, गरम पाणी घेतात. ते इतरांनाही अशा प्रकारचा सल्ला देत असतात. एवढेच नाही, तर गरम पाणी पिणारे दोन लोक भेटले आणि विषय निघाला की, त्यांच्यात कोण किती पाणी पितं? यावरही चर्चा होताना आपण अनेक वेळा बघतो, ऐकतो. मात्र, गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा खरोखरच चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...?

यासंदर्भात माहिती देताना द माइंडफूल डायटच्या (The Mindful Diet) आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात, "जेव्हा आपण सकाळी गरम पाणी घेतो, तेव्हा आपला मेटॅबॉलिक रेट वाढायला सुरुवात होते. मेटॅबॉलिक रेट वाढल्याने आपण जे काही अन्नपदार्थ पाण्यासोबत घेतो, ते चांगल्या पद्धतीने पचायला सुरुवात होते. साधारणपणे असे म्हटले जाते की, आपण गरम पाण्यासोबत काही मेडिसीन घेत असू, तर त्या मेडिसीनचे अॅब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होते. ते वेगाने काम करायला लागतात."

गरम पाण्याचे फायदे -मंजिरी कुलकर्णी सांगतात, "खरे तर, गरम पाण्याचे निश्चितच भरपूर फायदे आहेत. आपण जेव्हा गरम पाणी प्यायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या शरीरातील सूज वेगाने कमी होते. आता वजन कमी होतं म्हणजे काय? तर, जेव्हा आपली लाईफस्टाइल चांगली नसते किंवा आपल्या खाण्याच्या सवयी हेल्दी नसतात, तेव्हा आपल्या शरिरात एक प्रकारची सूज तयार झालेली असते. साधारणपणे ओबेसिटीमध्ये अथवा ओबेसिटी रिलेटेड डिसॉर्डरमध्ये ही सूज आपल्याला दिसून येते. यामुळे, जेव्हा एखादी वजन जास्त असलेली व्यक्ती गरम पाणी प्यायला सुरुवात करते, तेव्हा गरम पाणी प्यायल्याने मेटॅबॉलिक रेट वाढतो आणि यामुळे शरीरातील सूज झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते." 

"ही कमी झालेली सूज आपल्याला वजनाच्या म्हणजेच आकड्यांच्या स्वरुपात दिसते. पण यामुळे, चरबीचे प्रमाण कमी होत नाही. चरबीचे प्रमाण कमी होण्यासाठी आपल्याला डायटरी चेन्जसच आवश्यक आहेत आणि तेच करणे अपेक्षित आहे. म्हणजे आपण काहीही खात आहात आणि गरम पाणी रोज पीत आहात, तर गरम पाणी प्यायल्यानेच तुमची चरबी अथवा वजन कमी होईल असे नाही," असेही मंजिरी कुलकर्णी सांगतात. 

गरम पाणी दिवसभर चहा प्रमाणे घेतले तर...? -त्या पुढे सांगतात, "गरम पाण्याचा फायदा निश्चितच होतो. आपल्या शरीरावरील सूज कमी होते. डायजेशन व्यवस्थित होते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, आपण वाटेल ते खाऊ शकता आणि नुसतेच गरम पाणी घेऊन तुमचे वजन कमी होते. तर गरम पाण्याने मेटॅबॉलिक रेट वाढतो, डायजेशन चांगले होते. गरम पाणी केवळ सकाळीच न पिता, आपण दिवसभर चहा प्रमाणे घेत असाल तर त्याचे फायदेही खूप चांगले आहेत." 

गरम पाणी सर्वांना चालते का?गरम पाणी सर्वांना चालते का? यासंदर्भात बोलताना मंजिरी म्हणतात, "नाही. ज्या लोकांना उष्णतेचे विकार आहेत, ज्यांना पाइल्स सारखी समस्या आहे, अशा लोकांना गरम पाणी चालत नाही. यामुळे, आपण गरम पाणी प्यायला सुरुवात करायची आहे की नाही, हे आपण आपले शरीर आणि प्रकृती बघून ठरवायला हवे." 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सWaterपाणीHealthआरोग्य