शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवून उष्माघाताचा धोका टाळता येतो? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 5:01 PM

Heat stroke : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का? 

Heat stroke : उन्हाळ्यात अनेकदा उन्ह लागण्याचा म्हणजे उष्माघाताचा धोका अधिक असतो. बाहेर जाताना योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्हाला उन्हाचा तडाखा बसू शकतो. आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अनेकदा तर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का? 

काय आहे सत्य?

जुन्या काळात वाहनांची जास्त सोय नव्हती, ज्यामुळे लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात पायी चालत जावं लागत होतं. यामुळे उन्हाळ्यात लोक खिशात कांदा ठेवत होते. कारण यात वॉलटाईल ऑइल असतं, ज्यामुळे शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. पण केवळ कांदा खिसात ठेवून उष्माघाताचा धोका कमी करणं शक्य नाही.

जेवतानाही खावा कांदा

एक्सपर्ट्सनुसार, उन्हाळ्यात कांदा आपल्या रोजच्या आहाराचा भाग असला पाहिजे. याने बाहेरच्या तापमानाच्या प्रभावापासून बचाव करण्यास मदत मिळते. या असलेलं वॉलटाईल ऑइल एकीकडे शरीराला थंड ठेवतं तर सोबतच पोटॅशिअम आणि सोडिअमही शरीराला देतं. कच्चा कांदा अन्न पचवण्यासही मदत करतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या होत नाहीत. एक्सपर्ट रोज एक मीडिअम साइजचा कच्चा कांदा खाण्याचा सल्ला देतात.

उष्माघातापासून वाचण्यासाठी आहार

एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असला तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलवर असलेल्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात ताजी फळं, भाज्या आणि ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण बरोबर राहतं. ज्यामुळे शरीराला डिहायड्रैशनपासून बचाव करण्यास मदत मिळते. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो.

उन्हाळ्यात काय खावं?

उन्हाळ्यात रोज संत्री, अननस, कलिंगड, द्राक्ष खावेत.

कांदे, मिंट आणि खरबुजाचं सॅलडही शरीर थंड ठेवतं.

रोज एक किंवा दोन ग्लास फळांचा ज्यूस प्यावा.

दही, छास किंवा लस्सीचं सेवन करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य