शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्यायल्यानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; परिणाम ठरतील घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:09 IST

पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका.

भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे अनेकदा सांगितले जाते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. असे कराल तर ही चूक तुम्हाला भलतीच महागात पडेल.

आईसक्रीमउन्हाळ्यात आईसक्रीम म्हटल्यावरच तोंडाला पाणी सुटतं. तुमच्याही तोंडाला सुटलंना. पण मित्रहो आईसक्रीम खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका. यामुळे घशात खवखव होऊ शकते. आईसक्रीम खाल्ल्यानंतर १० मिनिटांनी पाणी प्यायलात तर अपाय होण्याचा टळू शकतो.

गरम पदार्थ खाल्ल्यानंतरकाही तज्ज्ञ असेही सांगतात की जेवताना पाणी पिऊ नये. त्यामुळे जेवताना पाणी पिणे शक्यतो टाळा. त्यातही तुम्ही गरम जेवण जेवत असाल तर त्यानंतर चूकूनही पाणी पिऊ नका. यामुळे तुमच्या पचनक्रीयेत अडथळा येऊ शकतो. पचनक्रिया झाल्यानंतर ते ते गुणधर्म शरीरातील सर्व भागांपर्यंत पोहचणे जरुरीचे आहे. गरम जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास या प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरम जेवल्यानंतर साधारण ३० मिनीटांनी पाणी प्यावे.

भाजलेले चणे खाल्ल्यानंतरभाजलेले चणे खाल्ल्यानंतर शरीरात अजिबात पाणी जाता कामा नये. कारण भाजलेले चणे पचवण्याकरीता जठराग्नी तीव्र होण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे हा जठराग्नी शांत होतो आणि चणे नीट पचत नाहीत. त्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

शेंगदाणे खाल्ल्यावर शेंगदाणे खाल्ल्यानंतर भरपूर तहान लागते. पाणी पिण्याची सतत इच्छ होते. पण जरा ताबा ठेवा कारण, शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळानंतर पाणी पिणे योग्य.

कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतरकलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. कलिंगड व टरबुजात मोठ्याप्रमाणावर पाणी असते. त्यामुळे आपली तहान नुसतं कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानेच शांत होते. अशात तुम्ही आणखी पाणी प्यायलात तर पित्त, पोट फुगलेलं वाटणे व पोटाचे इतर विकार होऊ शकतात.

काकडीकाकडीमध्येही ९५ टक्के पाणी असते त्यामुळे काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास जुलाब होण्याची शक्यता असते. काकडीमध्ये पोषणतत्वे मोठ्याप्रमाणावर असतात त्यामुळे शरीराला त्याचा फायदाच होतो. परंतू ज्यावेळी तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिता तेव्हा शरीरातील जीयाईची गती वाढते आणि हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नWaterपाणी