शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:01 PM

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात.

(Image Credit : Shakthi Health & Wellness Center)

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात. काही लोकांना त्यांना तणाव असल्याचं कळतं, पण काहींना कळतही नाही. अशात नेमकं काय करायचं हे त्यांना कळत नाही. मात्र अनेक शोधांनुसार, सतत येणाऱ्या तणावामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी होतं. पण हा तणाव दूर कऱण्यासाठी एक सोपा उपाय समोर आला आहे. 

डान्स केल्याने तणाव होतो कमी

(Image Credit : The New York Times)

दररोज १५ मिनिटे डान्स केल्याने एंजॉर्फिन लेव्हल नियंत्रित राहतं. याने तुमचा तणाव आणि चिंता दूर होते. डान्स केल्यानंतर तुम्हाला हलकं जाणवतं. कारण याने कॅलरी कमी होतात. डान्सने मन आणि शरीर यांत्यात समतोल साधला जातो. तसेच डान्स केल्याने शरीर लवचिकही होतं. 

हृदय राहत निरोगी

इटलीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, ज्या लोकांना हृदयासंबंधी आजार आहेत. त्यांनी रोज डान्स करायला हवा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. डान्स केल्याने हृदयात रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच डान्स केल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं. अमेरिकेतील नॅशनल हार्ट, लंग अॅन्ड ब्लड इन्स्टिट्यूट द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, बॉल डान्सने कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका कमी होतो. 

डान्स करा वजन कमी करा

जर तुम्ही दररोज डान्स करत असाल तर याने तुमच्या १५० ते ५०० कॅलरी बर्न होतात. त्यामुळे झुम्हा डान्सला वजन कमी करण्यासाठी चांगला डान्स मानला जातो. हा डान्स जर तुम्ही ६० मिनिटांसाठी केला तर ४०० ते ६०० कॅलरी बर्न होतात. तसेच मांसपेशीमध्ये ताणही येतो. पोटाच्या मांसपेशी लवचिक होतात. त्यामुळे पचनक्रियाही चांगली होते. 

हाडे होतात मजबूत

तारुण्यात जर तुम्ही डान्सचा तुमच्या दैंनंदिन जीवनात समावेश केला तर वाढत्या वयात तुम्हाला हाडांशी संबंधित आजार कमी होतील. याने ऑस्टियोपोसोसिस ठीक होतो. डान्सने हार्मोन्स नियंत्रित होतात. याने हाडांमधील कॅल्शिअम कमी होणं रोखलं जातं. 

एक्सपर्टचा सल्ला

डान्स करणे आपल्या भावना व्यक्त करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. जे अनेकजण बोलून व्यक्त करत नाहीत ते डान्सने करु शकतात. कारण शारीरिक हालचाह ही विचार आणि जाणिवांशी संबंधित असते. त्यामुळेच तुमच्यात सकारात्मक बदल बघायला मिळतात. पण यासाठी एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्यावा.

वेगवेगळ्या कारणांनी व्यक्तींना येणारा ताण हा नेहमीच त्रासदायक असतो. ताण कमी असेल तर फार फरक पडत नाही पण हाच जर जास्त झाला तर याचा जीवनावर आणि कामावर गंभीर परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त ताण आल्याने ऑफिस किंवा घरातील तुमची सर्व कामे प्रभावित होऊ शकतात.ही ती स्थिती असते जेव्हा एखादी व्यक्ती सहन करण्याची क्षमता गमावून बसतो. या कारणाने ही व्यक्ती कामात चांगलं प्रदर्शन करु शकत नाही. तज्ज्ञांचं मत आहे की, तणावाचं प्रमाण हे वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थिती आणि वैयक्तिक क्षमतेनुसार वेगवेगळी असते. 

तणावाचं प्रमाण पॅरामिटर्सच्या आधारावर मॉनिटर केलं जाऊ शकतं. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला तणावाच्या स्त्रोतापासून दूर जायचं असेल तरच...तणावाच्या मोठ्या कारणांपासून बचाव करण्याची इच्छा हे तणाव वाढण्याचं मुख्य कारण असण्याचं संकेत आहे. डॉक्टरांनुसार, 'अनेकजण जास्त तणावाच्या वातावरणात जीवन जगणे सुरुच ठेवतात. त्यांना या गोष्टींची माहितीच नसते की, सतत होणारी डोकेदुखी, सतत येणारा राग आणि शांत झोप न लागणे ही तणावाची कारणे असू शकतात. हे सामान्य लक्षण तणावाची असू शकतात आणि हे तुम्हाला स्वत:ला ओळखावी लागतात. जेव्हा तुमचा तणाव प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा तुमचं दैनंदिन जीवन प्रभावित होतं'.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स