शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

जुलाबाने हैराण झाला आहात? वेळीच जाणून घ्या अशावेळी काय खाऊ नये! अन्यथा गंभीर धोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:20 IST

जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जुलाब लागणे (Diarrhea) हा तसा फारसा गंभीर आजार नाही. काही दिवसांमध्येच हा आजार पूर्णपणे बरा होऊन जातो. फूड पॉयझनिंग, एखाद्या औषधाचा परिणाम किंवा शिळे पदार्थ खाणं अशा गोष्टींमुळे डायरिया, म्हणजेच जुलाब होऊ शकतात. अर्थात, जर आठवड्याभरानंतरही जुलाब सुरूच राहिले, तर त्याचं कारण (Diarrhea causes) इन्फेक्शन किंवा आतड्यांची सूज असंही असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जुलाबाची लक्षणंजुलाबाची लक्षणं (Diarrhea symptoms) ही आधी सांगणं कठीण आहे. मात्र, जुलाबांमुळे थकवा, उलटी, पोटदुखी, ब्लोटिंग, ताप येणं, विष्ठेतून रक्त किंवा पू येणं, वजन कमी होणं अशा प्रकारची लक्षणं जुलाब सुरू झाल्यानंतर हळूहळू दिसू लागतात.

डायरिया झाल्यावर काय खाऊ नयेजुलाबाचा थेट संबंध हा आपल्या खाण्याशी असतो. त्यामुळे जुलाबाची लागण झालेली असताना आपण काय खातो आणि काय खाणं (What not to eat during Diarrhea) टाळायला हवं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. काही पदार्थ असे आहेत, जे तुमचा त्रास आणखी वाढवू शकतात. यामध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, फ्राइड, फॅटी फूड, मसालेदार पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पोर्क, कच्च्या भाज्या, कांदा, मका, आंबट फळं, दारू, कॉफी, सोडा तसंच आर्टिफिशिअल स्वीटनर घाललेले पदार्थ यांचा समावेश होतो. त्यामुळे जुलाब झालेले असताना या यादीमधील पदार्थ टाळणंच तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं.

हे पदार्थ खाऊ शकताजुलाब लागल्यानंतर जास्तीतजास्त पाणी प्यायला हवं. सोबतच, कमी चहापूड टाकलेला चहा, शहाळं हेदेखील पिऊ शकता. थोडाफार आराम मिळू लागल्यास तुम्ही केळी, भात, सफरचंद, ब्रेड, अंडी आणि शिजवलेल्या भाज्या यांचंही सेवन (What can you eat during Diarrhea) करू शकता. हे सर्व पदार्थ पचायला हलके असल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर याचा ताण येत नाही.

घरगुती उपायघरच्याघरी योग्य आहार, औषधं यांच्या मदतीने तुम्ही जुलाबावर उपचार (Diarrhea home remedies) करू शकता. कित्येक वेळा बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्यामुळे जुलाब होतात. अशावेळी अँटिबायोटिक्स औषधाची गोळी किंवा पातळ औषध घेतल्याने मदत मिळते. सोबतच प्रोबायोटिक्स खाणंही फायद्याचं ठरतं.

या घरगुती उपायांनंतरही जुलाब ठीक होत नसतील, आणि 2 दिवसांहून अधिक काळ समस्या सुरूच राहिली; तर डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. जुलाबांमधून भरपूर पाणी जाऊन डीहायड्रेटेड झाल्याने अशक्तपणा वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. गंभीर स्वरुपात जुलाब झाल्यास रुग्णालयात भरतीदेखील होण्याची गरज भासू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स