शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

तुमच्या 'या' चुकांमुळे रक्तवाहिन्या होतात खराब; डायबिटीस, बीपीसह हार्ट अटॅकचा वाढतोय धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 10:25 IST

दैनंदिन जीवन जगत असताना आहार घेताना आपण अनेक चुका करत असतो.

दैनंदिन जीवन जगत असताना आहार घेताना आपण अनेक चुका करत असतो. त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. रक्ततवाहिन्यांमधून ऑक्सीजनयुक्त रक्त शरीराला मिळत असतं. नंतर ते रक्त हृदयापर्यंत पोहोचवले जातं. 

जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीरातील रक्तवाहिन्या कठोर होत असतात. आपल्या काही चुकिच्या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब  होत असतात. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या चुकिच्या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब होतात. आज आम्ही तुम्हाला आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ( हे पण वाचा-थंडीच्या दिवसात 'या' भाज्या खाणं ठरेल फायदेशीर)

सिगारेट पिण्याची सवय

सिगारेटसारख्या मादक पदार्थांचे सेवन शरीरासाठी धोकादायक असतं. कारण स्मोकिंगमुळे कॅन्सरसारखे  आजार  होतात. रक्तवाहिन्या दुखायला लागतात. अनेक प्रकरच्या कार्डीओवॅस्क्युलर आजारांचा धोका असतो.  कारण जर तुमच्या धमन्या तुम्हाला व्यवस्थीत हव्या असतील तर तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर सिगारेटचे सेवन  करणं सोडा. त्याप्रमाणेच तुम्ही दारूचे सेवन अधिक प्रमाणात करत असाल तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आणि रक्तदाबासंबंधी समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.  त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडून त्या खराब होत असतात. म्हणूनच तुम्ही मद्याचे सेवन जर करत असाल तर कमी प्रमाणात करा. ( हे पण वाचा--फक्त मास्कच नाही तर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी)

कमी पोटॅशियमचा आहार घेणे

रक्तवाहिन्या  स्वस्थ ठेवण्यासाठी पॉटॅशियम गरजेचे असते. शरीरात पोटॅशियमची कमी असेल तर रक्तवाहिन्या आकुंचन पावत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणून रक्तवाहिन्यांना चांगंल ठेवण्यासाठी पोटॅशियम मोठया प्रमाणात असेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यासाठी सहज उपलब्ध होत असलेला आहार केळी, संत्री, पपई आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. 

कमी फायबर असलेला आहार घ्या 

जर तुमच्या आहारात फायबरर्सचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो.  त्यामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले प्लाक साफ होतात. तसंच कोलेस्ट्रॉल  कमी होतं. फळं, भाज्यांसारख्या कमी फायबरर्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

साखर आणि मिठाचं जास्त सेवन

 जर तुम्ही आहारात चहा कॉफी किंवा इतर माध्यमातून साखरेचे अतिप्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर आणि डायबिटीस होण्याचा धोका असतो. म्हणून आहारात साखर आणि मिठाचा कमी प्रमाणात वापर करा. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका