शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुमच्या 'या' चुकांमुळे रक्तवाहिन्या होतात खराब; डायबिटीस, बीपीसह हार्ट अटॅकचा वाढतोय धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 10:25 IST

दैनंदिन जीवन जगत असताना आहार घेताना आपण अनेक चुका करत असतो.

दैनंदिन जीवन जगत असताना आहार घेताना आपण अनेक चुका करत असतो. त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. रक्ततवाहिन्यांमधून ऑक्सीजनयुक्त रक्त शरीराला मिळत असतं. नंतर ते रक्त हृदयापर्यंत पोहोचवले जातं. 

जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीरातील रक्तवाहिन्या कठोर होत असतात. आपल्या काही चुकिच्या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब  होत असतात. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या चुकिच्या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब होतात. आज आम्ही तुम्हाला आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ( हे पण वाचा-थंडीच्या दिवसात 'या' भाज्या खाणं ठरेल फायदेशीर)

सिगारेट पिण्याची सवय

सिगारेटसारख्या मादक पदार्थांचे सेवन शरीरासाठी धोकादायक असतं. कारण स्मोकिंगमुळे कॅन्सरसारखे  आजार  होतात. रक्तवाहिन्या दुखायला लागतात. अनेक प्रकरच्या कार्डीओवॅस्क्युलर आजारांचा धोका असतो.  कारण जर तुमच्या धमन्या तुम्हाला व्यवस्थीत हव्या असतील तर तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर सिगारेटचे सेवन  करणं सोडा. त्याप्रमाणेच तुम्ही दारूचे सेवन अधिक प्रमाणात करत असाल तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आणि रक्तदाबासंबंधी समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.  त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडून त्या खराब होत असतात. म्हणूनच तुम्ही मद्याचे सेवन जर करत असाल तर कमी प्रमाणात करा. ( हे पण वाचा--फक्त मास्कच नाही तर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी)

कमी पोटॅशियमचा आहार घेणे

रक्तवाहिन्या  स्वस्थ ठेवण्यासाठी पॉटॅशियम गरजेचे असते. शरीरात पोटॅशियमची कमी असेल तर रक्तवाहिन्या आकुंचन पावत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणून रक्तवाहिन्यांना चांगंल ठेवण्यासाठी पोटॅशियम मोठया प्रमाणात असेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यासाठी सहज उपलब्ध होत असलेला आहार केळी, संत्री, पपई आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. 

कमी फायबर असलेला आहार घ्या 

जर तुमच्या आहारात फायबरर्सचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो.  त्यामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले प्लाक साफ होतात. तसंच कोलेस्ट्रॉल  कमी होतं. फळं, भाज्यांसारख्या कमी फायबरर्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

साखर आणि मिठाचं जास्त सेवन

 जर तुम्ही आहारात चहा कॉफी किंवा इतर माध्यमातून साखरेचे अतिप्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर आणि डायबिटीस होण्याचा धोका असतो. म्हणून आहारात साखर आणि मिठाचा कमी प्रमाणात वापर करा. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका