शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

CoronaVirus  : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 12:02 IST

CoronaVirus News & Latest Updates : याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सुचना दिली होती. 

कोरोनाने  गेल्या  ७ ते -८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. आता भारतात हिवाळा सुरू होणार असल्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार?, कमी होणार? की आहे त्या स्थितीत राहणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सुपर कम्प्यूटरकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हायरसच्या प्रसार होण्यासाठी  आद्रतेचा खूप मोठं स्थान असते. त्यामुळेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सुचना दिली होती. 

आद्रतेचा परिणाम व्हायरसच्या प्रसारावर होतो.  त्यामुळे अशा वातावरणात व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. फुगाकू नावाच्या जपानी सुपर कम्प्यूटरने दिलेल्या माहितीनुसार ६० टक्के आद्रतेच्या तुलनेत हवेत आद्रता कमी झाल्यास व्हायरसच्या कणांचा समावेश वाढण्याची शक्यता असते. या अभ्यासातून दिसून आलं की, खिडकी उघडणं किंवा व्हेंटिलेशन शक्य नसेल तर ह्यूमिडिफायर्सचा वापर करून व्हायरसचा धोका कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो. रिकेन आणि कोब युनिव्हर्सिटीकडून हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित लोकांच्या माध्यमातून व्हायरसचे कण हवेत पसरतात. फूगाकू सुपर कंम्प्यूटरने याबाबत विश्लेषण केले होते. या अभ्यासात दिसून आलं की, फेस शिल्ड, फेस मास्कप्रमाणे प्रभावी ठरत नाही. या अभ्यासानुसार बंद हॉटेल्समध्ये एकाचवेळी जास्त लोक गेल्यास किंवा एसी सुरू असल्यास कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. रिकेन आणि कोब युनिव्हर्सिटीकडून याआधीही याप्रकारचं संशोधन करण्यात आलं होतं. त्यातून दिसून आलं की ट्रेनमध्ये प्रवास करत असताना खिडकी उघडल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो. 

कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात किती दिवस राहते रोगप्रतिकारशक्ती

कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात कोविड-१९ विरोधातील रोगप्रतिकारशक्ती किती दिवस राहते हे जाणून घेण्यासाठी अमेरिकी संशोधकांनी सहा हजार कोरोनाबाधितांचे नमुने घेतले होते. त्यामधून कोरोनामुक्त व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती किमान पाच महिन्यांपर्यंत राहते, असे समोर आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनामधील भारतीय वंशाच्या असोसिएट्स प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले होते.

या संशोधनादरम्यान, संशोधकांना दिसून आले की, SARC-CoV-2 विरोधात व्यक्तीच्या शरीरात विकसित होणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) सुमारे पाच महिन्यांपर्यंत राहतात. प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांनी सांगितले होते की, SARC-CoV-2 चा संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये पाच ते सात महिन्यांपर्यंत उच्च दर्जाच्या अँटीबॉडी तयार होताना आम्ही स्पष्टपणे पाहिले आहे. धोका वाढला! कोरोनामुळे उद्भवू शकतो कर्णबधिरपणा, तज्ज्ञांच्या दाव्याने वाढवली चिंता

जर्नल इम्युनिटी मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये भट्टाचार्य यांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधात रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत राहत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या अभ्यासाचा विचार केला आहे. त्यात आम्हाला दिसून आले की, शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्यानंतर किमान पाच महिन्यांपर्यंत ती टिकते. हे संशोधन प्राध्यापक जान्को निकोलिच जुगिच यांच्याकडून करण्यात आले  होते. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार? महाराष्ट्रातील 'या' शहरात Reinfection चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाJapanजपान