शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: काय सांगता! पुढील २ वर्ष तुम्हाला सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावंच लागेल, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 14:43 IST

व्हायरस विरूद्ध युद्धाचा हा पहिला टप्पा आहे. येणाऱ्या काळात बरीच आपत्ती लोकांसमोर येऊ शकते

ठळक मुद्देकिमान ६ महिने बरीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. लोकांनी किमान २ वर्षे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागेलकोरोना विषाणू वेळोवेळी स्वत: मध्ये बदल घडवून आणतो, ही एक अतिशय धोकादायक स्थिती

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेतीन लाखांपर्यंत लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना सध्यातरी सोशल डिस्टेंसिंगच पालन करावं लागत आहे. पण जगाला पुढील २ वर्ष म्हणजे २०२२ पर्यंत या कडक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या संदर्भात बरीच संशोधने पुढे येत आहेत.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की व्हायरस विरूद्ध युद्धाचा हा पहिला टप्पा आहे. येणाऱ्या काळात बरीच आपत्ती लोकांसमोर येऊ शकते. व्हायरसचा प्रभाव कमकुवत झाल्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले असले तरी थोडाशाही निष्काळजीपणा पुन्हा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरु शकेल. त्यामुळे कोट्यवधी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. डॉ. आयुष पाडे यांच्या मते, सोशल डिस्टेंसिंग हा एकमेव उपाय आहे ज्यामुळे वृद्ध, मुले आणि ज्यांची रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता कमी असणार्‍या लोकांसाठी फायदेशीर आहे.

हॉवर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून उघड

नुकतेच अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना गंभीर शंका आहे की, या काळात लॉकडाऊन नियम थोडेसे शिथिल केले तर विषाणूचा परिणाम पुन्हा गंभीर रूपात समोर येऊ शकतो. त्याचा मानवी जीवनाला धोका निर्माण होईल. कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिलं.

६ महिन्यांची कडक खबरदारी, २ वर्ष सोशल डिस्टेंसिंगचा नियम आवश्यक

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, व्हायरस इन्फ्लूएन्झा सारख्याच जगात जगेल. अशा परिस्थितीत किमान ६ महिने बरीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त लोकांनी किमान २ वर्षे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागेल असा त्यांनी आपल्या संशोधनात असा दावाही केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने लॉकडाऊन रोखण्यात कोरोना व्हायरस यशस्वी झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान २ आठवडे थांबायला सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे उद्भवू न शकल्यास लॉकडाऊन नियम शिथिल केले पाहिजेत.

हॉवर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे की, जोवर लस तयार होईपर्यंत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते,लस तयार होण्यासाठी किमान २ वर्षे लागू शकतात परंतु सामाजिक अंतरांसारख्या नियमांचे पालन करून आपल्याला जीवन जगणे बंधनकारक करावे लागेल.

तसेच कोरोना विषाणू देखील वेळोवेळी स्वत: मध्ये बदल घडवून आणतो, ही एक अतिशय धोकादायक स्थिती आहे. अशा परिस्थितीत, लस बनवणे अधिक क्लिष्ट होऊ शकते. याचे मुख्य कारण असे आहे की, कोरोना संक्रमित रूग्णात अनेकदा लक्षणे दिसू लागतात, तर अनेकांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. अशा परिस्थितीत स्वतः कोरोना विषाणूवरील संशोधनात शास्त्रज्ञ अजूनही संभ्रमावस्थेत आहेत असं हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

वरात घेऊन नवरदेव आला दारी; पण नवरीच्या ‘त्या’ हट्टापायी पुन्हा परतला माघारी, मग...

…म्हणून चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज; ट्रम्प यांची काय आहे ‘जी ७’ रणनीती?

निर्दयी! ९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले आई-वडील

१ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं

७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या