शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या इमारतींमुळे लोकांना 'या' आाजारांचा असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 13:23 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊननंतर बंद असलेली ठिकाणं पुन्हा सुरू झाल्यानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे जगभरातून २ लाखापेंक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी  सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत.  अशात  कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यात परिणामकारक ठरणाराा उपाय म्हणजे लॉकडाऊन. पण लॉकडाऊननंतर बंद असलेली ठिकाणं पुन्हा सुरू झाल्यानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

कॉलेज, मॉल, जिम, हॉटेल्स, शाळा अशी सार्वजनिक ठिकाणं बंद आहेत. बंद  इमारतीमधील पाण्याच्या पाइपमध्ये भरपूर दिवसांपासून असलेल्या पाण्यात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. तज्ञांकडून लॉकडाऊनदरम्यान बंद असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर रिसर्च सुरू आहे. त्याचा सुरक्षितपणे पुनर्वापर कसा होईल, हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तज्ञांनी अमेरिकेत अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या परड्यु युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील इमारतींमधील पाण्याचे सॅम्पल्स घेतले. बंद असलेल्या या इमारतीतल्या पाण्यात किटाणूनाशक नसल्याचं दिसून आलं.  या इमारतीतल्या पाण्यात सूक्ष्मजीवांमध्ये पुढील काही महिन्यांत काय बदल होतात, हे पाहण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा सुरू आहे.

परड्यु युनिव्हर्सिटीतील पर्यावरण इंजीनिअर एंड्रयू वेलटन यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या इमारतींबाबत लोकांमध्ये जास्त जागरूकता नाही कारण याबाबत काही मार्गदर्शन करण्यात आलेलं नाही. वेल्टीन आणि त्यांच्यासह काम करणाऱ्या इंजिनीअर कॅटलिन प्रॉक्टर यांचे यावर अधिक काम सुरू आहे. एखादी इमारत जितके जास्त दिवस बंद असते तितके जास्त दिवस तिच्यात बॅक्टेरियांची वाढ होऊन नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते.

वॉटर ट्रिटमेंट आणि त्यानंतर पाण्याचा वापर यामध्ये मोठा  कालावधी गेल्याने पाण्यात बॅक्टेरियांची पैदास होऊ शकते. शास्त्रज्ञांनी लीजोनेला या विशेष प्रकारच्या बॅक्टेरियाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे बॅक्टेरिया लीजोनायर्स हा आजार पसरवतात. हा आजार पाण्यामार्फत पसरतो. त्यामुळे व्यक्तीच्या श्वास घेण्याच्या क्रियेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. 

कोरोनाचा प्रसार होत असताना  हा आजार सुद्धा लोकांना आपलं शिकार बनवू शकतो. यावर उपाय म्हणून जर बंद नळांमधून काहीप्रमाणात पाणी वाहून जाऊ दिलं तर संकट टाळता येऊ शकतं. असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. (हे पण वाचा-घरी बसून शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढलंय का? 'या' लक्षणांनी ओळखा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या