शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ५० लाखांचा टप्पा, ८२ हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 10:03 IST

गेल्या २४ तासांत ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे.

ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ५० लाखांचा टप्पा कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल ८२ हजार रुग्णांचा मृत्यू ५० लाख कोरोनाबाधितांपैकी ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा कहर सुरूच असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला. आहे. तसेच कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल ८२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून ही भयावह माहिती समोर आली आहे.गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या ९० हजार १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर या दिवसभरात तब्बल १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. काल ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे. तर १२९० जणांच्या मृत्यूंमुळे कोरोनाबळींचा आकडा ८२ ह्जार ६६ वर पोहोचला आहे.

देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे ५० लाख कोरोनाबाधितांपैकी ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशामध्ये कोरोनाचे ९ लाख ९५ हजार ९३३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मंगळवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या २० हजार ४८२नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ५१५ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ११ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.दरम्यान, कोरोनाबाबत सिरो सर्व्हेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे .दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेनुसार कोरोनामुक्त झालेल्या ३० टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडी दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचे गृहितक खोटे ठरले आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही समोर आले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य