शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: "कोरोना नियंत्रणात येणार, फेब्रुवारीपर्यंत केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरणार"

By बाळकृष्ण परब | Updated: October 19, 2020 19:15 IST

corona virus news : गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

ठळक मुद्देपुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरतीलकोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल

नवी दिल्ली - मार्च महिन्यापासून देशात धुमाकूळ घालत असलेल्या आणि सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावाने सर्वांना चिंतेत टाकले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून केवळ ४० हजार एवढीच राहील, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचे आकलन करणारे मॉडेल तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या संशोधनामधून जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरतील, असा दावा हर्षवर्धन यांनी केला.



कोरोनावरील लसीबाबत हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल. देशात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही आहे. तसेच आम्ही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होतानाही बघत आहोत.

यापूर्वी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी थंडीच्या ऋतूमध्ये संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत