शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Coronavirus : वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे? जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 13:55 IST

Coronavirus : देशात आणि परदेशात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत ज्यात वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोना होत आहे. अशा केसेसची संख्या भलेही कमी आहे. पण धोका असतोच.

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचं थैमान अजूनही देशात सुरू आहे. कोरोना संक्रमणातून बचावासाठी सध्या सर्वात चांगला उपाय वॅक्सीनच (Corona Vaccine) आहे. पण देशात आणि परदेशात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत ज्यात वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोना होत आहे. अशा केसेसची संख्या भलेही कमी आहे. पण धोका असतोच. अशात असं का होत आहे, वॅक्सीन घेतल्यावर लोकांनी काय काळजी घ्यावी यावर एक्सपर्ट्सनी काही सल्ले दिले आहेत.

काय आहे कारण?

जर एखाद्या व्यक्तीने कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतला असेल, पण नंतर त्याला कोरोनाची लागण झाली असेल. यावर बिडला हॉस्पिटलचे डॉ. राजा धार यांनी सांगितले की, वॅक्सीन एक बूस्टर म्हणून काम करते. ज्याने तुमचा ताप आणि इतर प्रकारच्या लक्षणांपासून बचाव होण्यास मदत मिळते. याने तुमची मदत होते, पण तुम्ही वॅक्सीन घेतल्यावरही काळजी घेण्याची गरज आहे. (हे पण वाचा : Mucormycosis : 'असा' मास्क वापरत असाल तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लॅक फंगस; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा)

एक्सपर्ट काय सांगतात?

दुसरे एक्सपर्ट मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अविरल रॉय यांच्यानुसार, वॅक्सीन तुमच्या शरीराला काही प्रमाणात ताकद देते.  पण पुन्हा संक्रमण होण्यामागे एक कारण आहे. व्हायरस हा नाकातून आपल्या शरीरात प्रवेश करतो. पण आता जी वक्सीन मिळत आहे ती नाकात नाही तर रक्तात अॅंटीबॉडी तयार करत आहे. अशात व्हायरसचा येण्याचा मार्ग उघडाच आहे. मात्र, वॅक्सीन घेतली तर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

लोकांच्या मनात असाही प्रश्न आहे की, वॅक्सीन अखेर किती मदत करत आहे. काही एक्सपर्ट सांगतात की, वॅक्सीनचा एक डोज दोन आठवड्यांनंतर प्रभाव दाखवतो आणि कोणत्याही व्यक्तीला ५०-५० टक्के सुरक्षा मिळते. तर काही एक्सपर्ट ही सुरक्षा ८५ टक्के मिळत असल्याचं सांगतात. तेच दुसरा डोज घेतल्यावर कोरोनापासून सुरक्षा ९५ टक्के मिळते असं सांगितलं जातं. (हे पण वाचा : कोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय)

आता जेव्हा काही लोकांना वॅक्सीन घेतल्यावरही कोरोना होत आहे. तर लोकांच्या मनात वॅक्सीनबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पण मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अविरल रॉय म्हणाले की, वॅक्सीन घेण्यासाठी काही विचार करण्याची गरज नाही. तुमचा नंबर येत असेल तर नक्की घ्या. वॅक्सीनने तुमचं काही वाईट होत नाही. उलट वॅक्सीन घेतल्यावर तुम्हाला कोरोना झाला तरी त्याच्यासोबत लढण्याची तुम्हाला ताकद मिळेल. कोरोनाचा प्रभाव कमी होईल.

तेच डॉ.धर म्हणाले की, वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्याने सुरक्षा मिळते ती काही प्रमाणात कमी असते. पण लोकांना वाटतं की, आता वॅक्सीन घेतली तर काहीच समस्या होणार नाही. अशात लोक बेजबाबदारपणे वागू लागतात.

वॅक्सीनेशन नंतर काय करावं?

लोक आता वॅक्सीन घेत आहेत. पण त्यानंतर एक सर्वात मोठी चूक बघायला मिळत आहे. ती म्हणजे मास्क योग्यप्रकारे वापर न दिसणे. वॅक्सीनला अॅंटीबॉडी बनवायला दोन आठवड्यांचा वेळ लागतो. अशात लोकांनी सर्व गाइडलाईनचं पालन केलं पाहिजे. कोरोना हा नाकातूनच शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे एक्सपर्ट हेच सांगतात की तुम्ही मास्क लावूनच ठेवावा. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य