शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 18:38 IST

अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अन्न घाई-गडबडीत कधीही खाऊ नये, असे आपल्याला वडीलधारी माणसं लहानपणापासून सांगत आली आहेत. अन्न नीट चावले पाहिजे, ते लगेच गिळू नये आणि न चावता थेट पोटात जाऊ देऊ नये. तुम्ही असंही ऐकलं असेल की अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अनेकवेळा तुमच्या मनात प्रश्न येईल की, शेवटी अन्न चावून खाण्यास का सांगितले जाते? यामागचे कारण काय आणि असे केल्याने शरीराला काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे देताना दैनिक भास्कर वृत्तपत्रानं तज्ज्ञांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. (Drink Your Food, Chew Water). या अहवालात, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण संशोधक डॉ. सुभाषश्री रे (Dr. Subhasree Ray) लिहितात की, अन्नाचं पचन तोंडापासून सुरू होतं. अन्न चघळल्यानं तोंडात तयार होणारी लाळ अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितकं आतड्याच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. पाणी पितानाही गटागट एकमद पोटात घेणं चुकीचं आहे. पाणी पिताना शांतपणे घोट-घोट घ्यायला हवे. अशा पद्धतीनं प्यायलेल्या पाण्याचा शरीराला अधिक फायदा होतो.

अन्न जितकं जास्त चघळलं जाईल, तितकं ते आतड्यांच्या संपर्कात येईल, बारीक होईल, असे डॉ. सुभाषश्री सांगतात. त्यामुळं अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात मिसळू शकतील. याशिवाय चघळल्याशिवाय किंवा कमी चघळल्याशिवाय जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते. असंही घडतं की खूप लवकर-लवकर खाल्ल्यानंतर मेंदूला उशीरानं पोट भरण्याचे संकेत मिळतात. त्यामुळं अन्न भुकेपेक्षा जास्त खाल्लं जाऊन आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. तर, अन्न चघळण्याचे आणि खाण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ.

लठ्ठपणा आणि वजन कमी होणेभूक आणि शरीरातील कॅलरीजचं प्रमाण प्रामुख्यानं हार्मोन्सद्वारे नियंत्रित केलं जातं. जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन (Ghrelin) नावाचं हार्मोन कमी होतं. हे हार्मोन भूक नियंत्रित करतं. यासोबतच जेवणानंतर आतडं अशी हार्मोन्स सोडतात, ज्यामुळे पोट भरल्याची भावना येते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे २० मिनिटं लागतात. एवढंच नाही तर अन्न चघळल्यानं तुमचा खाण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. याचा परिणाम म्हणजे स्थूलपणा कमी होतो. कारण, शरीराला आवश्यक तेवढ्याच कॅलरीज मिळतात.

भूक कमी असेल तर पोषण कसं मिळणार?'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'च्या (The American Journal of Clinical Nutrition) संशोधनानुसार, जेव्हा अन्न पुरेसं चघळलं जातं, तेव्हा ते अगदी लहान तुकड्यांमध्ये बदलते. जे गिळल्यावर घशावर पडणारा ताण कमी होतो. तसंच, जेव्हा हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा एन्झाईम्स त्यांत सहजपणे विरघळतात. ज्यामुळं पोषण अधिक प्रमाणात तयार होतं आणि शरीरात वेगानं शोषलं जातं. यामुळं कमी अन्न खाऊनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिनं मिळतात.

अन्न-पाणी घाईत खाण्याचे तोटेनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही अन्न योग्य प्रमाणात चघळत नाही आणि पाणी वेगात पिता तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळं पोट फुगणं, जुलाब, छातीत जळजळ आणि जास्त प्रमाणात ऍसिड तयार होणं, पोटदुखी, नाकातून पाणी येणं, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स