शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 18:38 IST

अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अन्न घाई-गडबडीत कधीही खाऊ नये, असे आपल्याला वडीलधारी माणसं लहानपणापासून सांगत आली आहेत. अन्न नीट चावले पाहिजे, ते लगेच गिळू नये आणि न चावता थेट पोटात जाऊ देऊ नये. तुम्ही असंही ऐकलं असेल की अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अनेकवेळा तुमच्या मनात प्रश्न येईल की, शेवटी अन्न चावून खाण्यास का सांगितले जाते? यामागचे कारण काय आणि असे केल्याने शरीराला काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे देताना दैनिक भास्कर वृत्तपत्रानं तज्ज्ञांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. (Drink Your Food, Chew Water). या अहवालात, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण संशोधक डॉ. सुभाषश्री रे (Dr. Subhasree Ray) लिहितात की, अन्नाचं पचन तोंडापासून सुरू होतं. अन्न चघळल्यानं तोंडात तयार होणारी लाळ अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितकं आतड्याच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. पाणी पितानाही गटागट एकमद पोटात घेणं चुकीचं आहे. पाणी पिताना शांतपणे घोट-घोट घ्यायला हवे. अशा पद्धतीनं प्यायलेल्या पाण्याचा शरीराला अधिक फायदा होतो.

अन्न जितकं जास्त चघळलं जाईल, तितकं ते आतड्यांच्या संपर्कात येईल, बारीक होईल, असे डॉ. सुभाषश्री सांगतात. त्यामुळं अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात मिसळू शकतील. याशिवाय चघळल्याशिवाय किंवा कमी चघळल्याशिवाय जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते. असंही घडतं की खूप लवकर-लवकर खाल्ल्यानंतर मेंदूला उशीरानं पोट भरण्याचे संकेत मिळतात. त्यामुळं अन्न भुकेपेक्षा जास्त खाल्लं जाऊन आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. तर, अन्न चघळण्याचे आणि खाण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ.

लठ्ठपणा आणि वजन कमी होणेभूक आणि शरीरातील कॅलरीजचं प्रमाण प्रामुख्यानं हार्मोन्सद्वारे नियंत्रित केलं जातं. जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन (Ghrelin) नावाचं हार्मोन कमी होतं. हे हार्मोन भूक नियंत्रित करतं. यासोबतच जेवणानंतर आतडं अशी हार्मोन्स सोडतात, ज्यामुळे पोट भरल्याची भावना येते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे २० मिनिटं लागतात. एवढंच नाही तर अन्न चघळल्यानं तुमचा खाण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. याचा परिणाम म्हणजे स्थूलपणा कमी होतो. कारण, शरीराला आवश्यक तेवढ्याच कॅलरीज मिळतात.

भूक कमी असेल तर पोषण कसं मिळणार?'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'च्या (The American Journal of Clinical Nutrition) संशोधनानुसार, जेव्हा अन्न पुरेसं चघळलं जातं, तेव्हा ते अगदी लहान तुकड्यांमध्ये बदलते. जे गिळल्यावर घशावर पडणारा ताण कमी होतो. तसंच, जेव्हा हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा एन्झाईम्स त्यांत सहजपणे विरघळतात. ज्यामुळं पोषण अधिक प्रमाणात तयार होतं आणि शरीरात वेगानं शोषलं जातं. यामुळं कमी अन्न खाऊनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिनं मिळतात.

अन्न-पाणी घाईत खाण्याचे तोटेनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही अन्न योग्य प्रमाणात चघळत नाही आणि पाणी वेगात पिता तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळं पोट फुगणं, जुलाब, छातीत जळजळ आणि जास्त प्रमाणात ऍसिड तयार होणं, पोटदुखी, नाकातून पाणी येणं, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स