शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 18:38 IST

अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अन्न घाई-गडबडीत कधीही खाऊ नये, असे आपल्याला वडीलधारी माणसं लहानपणापासून सांगत आली आहेत. अन्न नीट चावले पाहिजे, ते लगेच गिळू नये आणि न चावता थेट पोटात जाऊ देऊ नये. तुम्ही असंही ऐकलं असेल की अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अनेकवेळा तुमच्या मनात प्रश्न येईल की, शेवटी अन्न चावून खाण्यास का सांगितले जाते? यामागचे कारण काय आणि असे केल्याने शरीराला काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे देताना दैनिक भास्कर वृत्तपत्रानं तज्ज्ञांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. (Drink Your Food, Chew Water). या अहवालात, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण संशोधक डॉ. सुभाषश्री रे (Dr. Subhasree Ray) लिहितात की, अन्नाचं पचन तोंडापासून सुरू होतं. अन्न चघळल्यानं तोंडात तयार होणारी लाळ अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितकं आतड्याच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. पाणी पितानाही गटागट एकमद पोटात घेणं चुकीचं आहे. पाणी पिताना शांतपणे घोट-घोट घ्यायला हवे. अशा पद्धतीनं प्यायलेल्या पाण्याचा शरीराला अधिक फायदा होतो.

अन्न जितकं जास्त चघळलं जाईल, तितकं ते आतड्यांच्या संपर्कात येईल, बारीक होईल, असे डॉ. सुभाषश्री सांगतात. त्यामुळं अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात मिसळू शकतील. याशिवाय चघळल्याशिवाय किंवा कमी चघळल्याशिवाय जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते. असंही घडतं की खूप लवकर-लवकर खाल्ल्यानंतर मेंदूला उशीरानं पोट भरण्याचे संकेत मिळतात. त्यामुळं अन्न भुकेपेक्षा जास्त खाल्लं जाऊन आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. तर, अन्न चघळण्याचे आणि खाण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ.

लठ्ठपणा आणि वजन कमी होणेभूक आणि शरीरातील कॅलरीजचं प्रमाण प्रामुख्यानं हार्मोन्सद्वारे नियंत्रित केलं जातं. जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन (Ghrelin) नावाचं हार्मोन कमी होतं. हे हार्मोन भूक नियंत्रित करतं. यासोबतच जेवणानंतर आतडं अशी हार्मोन्स सोडतात, ज्यामुळे पोट भरल्याची भावना येते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे २० मिनिटं लागतात. एवढंच नाही तर अन्न चघळल्यानं तुमचा खाण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. याचा परिणाम म्हणजे स्थूलपणा कमी होतो. कारण, शरीराला आवश्यक तेवढ्याच कॅलरीज मिळतात.

भूक कमी असेल तर पोषण कसं मिळणार?'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'च्या (The American Journal of Clinical Nutrition) संशोधनानुसार, जेव्हा अन्न पुरेसं चघळलं जातं, तेव्हा ते अगदी लहान तुकड्यांमध्ये बदलते. जे गिळल्यावर घशावर पडणारा ताण कमी होतो. तसंच, जेव्हा हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा एन्झाईम्स त्यांत सहजपणे विरघळतात. ज्यामुळं पोषण अधिक प्रमाणात तयार होतं आणि शरीरात वेगानं शोषलं जातं. यामुळं कमी अन्न खाऊनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिनं मिळतात.

अन्न-पाणी घाईत खाण्याचे तोटेनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही अन्न योग्य प्रमाणात चघळत नाही आणि पाणी वेगात पिता तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळं पोट फुगणं, जुलाब, छातीत जळजळ आणि जास्त प्रमाणात ऍसिड तयार होणं, पोटदुखी, नाकातून पाणी येणं, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स