शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणानंतर वजन वाढलंय? 'या' सहा गोष्टी नक्की ठरतील फायद्याच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:00 IST

बाळंतपणानंतरचं वजन कसं घटवायचं? हा मोठा प्रश्न बाळंतीण महिलेला पडला असतो.

मुंबई- वजन कमी करणं व आहे ते वजन आटोक्यात ठेवणं हा सगळ्यांसाठीच मोठा टास्क असतो. नियमित व्यायाम व खाण्यापिण्याच्या योग्य सवयीमुळे वजन घटत असलं तरी अनेकांकडून वजन कमी होत नसल्याच्या तक्रारीही आहेत. विशेष म्हणजे बाळंतपणानंतरचं वजन कसं घटवायचं? हा मोठा प्रश्न बाळंतीण महिलेला पडला असतो. काही बाळंतीण महिलांचं वजन लगेच घटतं तर काहींना बरिच मेहनत करावी लागते. तुम्हाला जर गरोदरपणातील वजन घटवायचं असेल तर या सोप्या गोष्टी नक्की करून पाहा. 

योग्य व संतुलित आहार घ्या-तुमच्या दैनंदिनीमध्ये केलेले काही छोटे बदल बाळंतपणानंतरच वजन घटविण्यासाठी फायद्याचे ठरतता. त्यासाठी कठीण डाएट प्लॅन किंवा जीममध्ये कठोर मेहनतीची गरज नाही, असं अनेकदा अभ्यासातून समोर आलं आहे. बाळंतपणात वाढलेलं वजन घटविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य व संतुलित आहार घेणं. दिवसातून पाच वेळा योग्य प्रमाणात फळ व भाज्या खा. तुमची नुकतीचं डिलिव्हरी झाली असल्याने तुमच्या शरीराची झिज भरून काढण्यासाठी पोषक पदार्थांची आवश्यकता असते, शरीराला कॅलेरीज आवश्यक असतात. यासाठी फळ व भाज्या खाणं फायद्याचं ठरेल.जास्त साखर, फॅट्स, मीठ आणि कॅलेरीज असलेले पदार्थ खाऊ नका. संतुलित आहार वजन घटवायला नक्की मदत करतो. 

फायबर जास्त असलेले पदार्थ खाहाय फायबर असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्की फायदा होतो. ओट्स, सोयाबीन, डाळ, धान्य आणि बियाणांचा जास्त समावेश आहारात करा. 

योग्य प्रोटीनचा समावेशआहारात प्रोटीनचा योग्य समावेश असल्यास तुमचं मेटाबॉलिज्म चांगलं होतं. मेटाबॉलिज्म रेट योग्य असल्यास वजन घटणं लवकर शक्य होतं. यासाठी आहारात अंडी, मांस, मासे, शेंगदाणे, काजू यांचा समावेश करा. 

भरपूर पाणी प्याबाळंतीण महिलेच्या शरीरासाठी पाणी अत्यंत उपयुक्त आहे. बाळाला दूध पाजत असल्याने आईच्या शरीराचं तापमान व पचनशक्ती योग्य ठेवण्याचं काम पाणी करतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. दिवासाला एक लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वर्षाला दोन किलो वजन कमी होतं, असं अनेक अभ्यासातून सिद्ध झालं आहे. पाण्यामुळे मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. पाणी जास्त प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे कमी खाल्लं जातं. 

व्यायाम करायोग्य आहाराबरोबर व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. एका ठिकाणी फार वेळ बसल्याने शरीरातील चरबी वाढते. व्यायाम केल्याने शरीराची प्रक्रिया योग्य होऊन मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांची बाधा होत नाही. व्यायाम करणं म्हणजे जीमला जाणं. ही व्याख्या पूर्णपणे चुकीची आहे. व्यायाम करण्यासाठी जीमला जाण्याची गरज नाही. चालणं हा उत्तम व्यायाम असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन मस्त चालून आलात तरी ते पुरेसं आहे. त्याचबरोबर योगाही करता येईल. 

पुरेशी झोपं घ्यापुरेशी झोप न होणं वजनावर वाईट परिणाम करतं. वरील सर्व बाबींचं जरी पालन केलं तर पुरेशी झोप न घेतल्यास त्याचा योग्य परिणाम होणार नाही. जर तुम्हाला आठ तास झोप घेणं शक्य नसेल तर जितकी झोप घेता येईल तितकी नक्की घ्या. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. योग्य झोप झाल्यास दिवसही छान जातो व आहारा-व्यायाम याचा योग्य मेळ साधता येतो. 

नोट- वरील संपूर्ण माहिती तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्हाला जर वजन घटवायचं असेल तर वरील गोष्टी करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स