शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 16:46 IST

Cancer Patients : कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो.

कर्करोग हा शब्द जरी ऐकला तरी काही क्षणासाठी मनात एकच भीती दाटून येते. कर्करोगाचे निदान झाल्यास रूग्णाला पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. हा अतिशय घातक आजार असून हा रूग्णाच्या केवळ शारीरिकच नव्हेतर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. कारण कर्करोगावरील उपचार खूप वेदनादायी, खर्चिक आणि वर्षानुवर्षे चालणारे असतात. या उपचाराचा काळावधीत रूग्णाच्या शरीरावरच नव्हेतर मनावरही अनेक घातक होतात. बरेच रूग्ण चिंता व नैराश्याच्या गर्तेत अडकलेले दिसून येतात. या आजारपणामुळे कंटाळलेल्या या रूग्णांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे. कर्करूग्णांना लढण्याचे बळ दिल्यास कर्करोगावर ते सहज मात करू शकतील.

कर्करोगाचा परिणाम केवळ एखाद्याच्या शरीरावर होत नाही तर मनावरही होतो, हे एक सत्य आहे. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते. कर्करोगाचे निदान झाल्यास रूग्णाचे संपूर्णच बदलून जाते. कुटुंबात एकच चिंतेचे वातावरण पाहायला मिळते. कर्करोगावरील वेदनादायी उपचारात किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे रूग्णाला अशक्तपणा येतो. या औषधोपचारांमुळे अनेक रूग्णांना एकाकीपणा जाणवत असल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. परंतु, कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो. याकरता कर्करोगावरील उपचार सुरू असताना रूग्णांनी स्वतः मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

1.       मानसिक ताणतणाव, चिंता किंवा नैराश्य येऊ नये, यासाठी तुम्ही स्वतःचे मन कुठल्यातरी कामात गुंतवण्याचा प्रयत्न करा. यासाठी दैनंदिन वेळापत्रक तयार करा. 2.       दिवसभराच्या कामातून काही वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वतःच्या मनाशी बोलण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपल्या शरीरात कोणते बदल असामान्य बदल होतात का हे लक्षात घेऊन त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 3.       आपल्याला कशाची चिंता वाटते, कशामुळे तुम्हाला आनंद होतो, कोणत्या गोष्टीमुळे तुमचा तणाव वाढतो यासंबंधी गोष्टी एका वहीत लिहून ठेवा. सकारात्मक विचार लिहा आणि यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल. 4.       जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहा. तुम्हाला कर्करोग असल्याचं निदान झाल्यास हार मानू नका. हिंमतीने या समस्येला सामोरे जा. यामुळे कर्करोगाशी लढण्याचे बळ मिळेल. 5.       नैराश्य व चिंता कमी करण्यासाठी नियमित ध्यान व योगासने करा. याशिवाय दररोज चालणे किंवा एरोबिक्स करणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 6.       तणाव कमी व्हावा, यासाठी वाचन,  संगीत ऐकणे, शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, चित्रकला किंवा बागकाम करणे निवडू शकता. आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. 7.       मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळेपणे बोला, यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो. 8.       संतुलित आणि निरोगी आहाराचे सेवन करा. ताजी फळे आणि भाज्या खा. मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. मद्यपान आणि धूम्रपान करू नका. 9.       वेळोवेळी मानसिक आरोग्याची तपासणी कर्करोगाच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. नैराश्य व चिंतेत असणाऱ्या रूग्णांचे समुपदेशन केल्यास ते निरोगी आरोग्य जगू शकतात.

10.   कर्करोगावर यशस्वीरित्या मात केलेल्या रुग्णांशी बोलू शकता, कर्करोगाचा सामना करणाऱ्या रूग्णांविषयी वाचू शकता जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल.

- डॉ. शिवांगी पवार, सल्लागार मनोचिकित्सक

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्य