शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Dont worry! चिकन खाल्यास बर्ड फ्लूचा धोका नाही; फक्त 'ही' काळजी घ्यावी लागणार, तज्ज्ञांचा सल्ला

By manali.bagul | Published: January 06, 2021 1:47 PM

Health Tips in Marathi : जर चिकन चांगल्या पद्धतीने शिजलं गेलं नाही तर धोका वाढू शकतो. तुम्ही घरात चिकन शिजवत असाल तर योग्य ती काळजी घ्याल, पण बाहेरचं आणून खात असाल तर मात्र सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  

देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूने कहर केला आहे. दिवसेंदिवस मुकी जनावरं माणसांसाठी धोकादायक ठरत आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि केरळ या राज्यात बर्ड फ्लूने  हाहाकार पसरवला आहे.  आता बर्ड फ्लूमुळे माणसांना कितपत धोका उद्भवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चिकन खाल्यानं बर्ड फ्लू पसरेल का? चिकन खायचं की नाही असे प्रश्न लोकांना पडत आहे.  आजतकशी बोलताना Central Poultry Development Organization च्या डॉक्टर कामना यांनी या बाबत अधिक माहिती दिली आहे. बर्ड फ्लूच्या प्रसारामुळे अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुम्हीही कोणत्याही पोल्ट्री फॉर्मच्या आजूबाजूला जाणार नाही अशी काळजी घ्यायला हवी. 

डॉ. कामना यांनी दिलेल्या माहितीनुसार अंडी, चिकन खाताना  सावधगिरी बाळगायला हवी. जर चिकन चांगल्या पद्धतीने शिजलं गेलं नाही तर धोका वाढू शकतो. तुम्ही घरात चिकन शिजवत असाल तर योग्य ती काळजी घ्याल पण बाहेरचं आणून खात असाल तर मात्र सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  कारण बाहेरचं चिकन जास्त शिजलं नसेल तर आरोग्याला धोका उद्भवू शकतो. 

बर्ड फ्लू वेगवेगळ्या राज्यात वेगाने पसरत आहे. पक्ष्यांमधून माणसांमध्ये पसरण्याचा धोका वाढत आहे. जे लोक पोल्ट्री फॉर्मध्ये काम  करतात त्यांना धोका जास्त असू शकतो. पोल्ट्री फॉर्ममध्ये  कामाला असलेल्या किंवा संपर्कात असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. अनेकदा सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बर्ड फ्लूच्या प्रसाराचं कारण ठरू शकतं.

एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी अधिकाधिक साफसफाईवर लक्ष द्यायला हवं. कारण कोरोना काळात लोकांना आधीच स्वच्छता आणि हात धुण्याची सवय झाली आहे. त्यामुळे जास्त काही वेगळी काळजी घ्यायची गरज नाही.  स्वच्छता, खाण्यापिण्यावर नियंत्रण, काय खायचं, काय नाही खायचं हे पाहून तुम्ही आजारांपासून लांब राहू शकता. 

फक्त धुम्रपान नाही तर 'या' कारणांमुळे उद्भवतोय फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका; जाणून घ्या लक्षणं

मध्य प्रदेशातील सरकारने आपल्या परिसरातील लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.  दरम्यान चिकन किंवा अंडे खाल्ल्यानं कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार चिकन, अंडी  चांगल्या पद्धतीनं शिजलेली असतील तर आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.  म्हणून शिजवताना अन्न, मास कच्च राहू देऊ नका. 

सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत

मध्य प्रदेशातील अनेक कोंबड्यामध्ये व्हायरसने नमुने दिसून आलेले नाहीत. त्यामुळे चिंतेचे कारण कमी आहे. कारण व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका कोंबड्यांमध्ये असतो. मध्यप्रदेशात आता कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू पसरल्यानं चिंतेचं वातावरण पसरले आहे.  

H5N1 पासून H5N5 बर्ड फ्लू धोकादायक मानले जातात. ते वेगानं पसरतात. मात्र H5N8 एवियन इन्फ्लुएंजानं केवळ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. H5N1 विषाणू अतिशय धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. H5N1 च्या विषाणूनं माणसाच्या शरीरात प्रवेश केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र तो माणसातून माणसात पसरलेला नाही. मात्र हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. या विषाणूची लागण झालेले ६० टक्के जण जीवाला मुकतात.  H5NI विषाणूची लागण माणसांना झाल्यास धोकादायक ठरू शकते, असा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. विषाणूची बाधा झाल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. याशिवाय जीव जाण्याचा धोका असतो.

 

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य