शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

बीडी ओढल्याने भारताला झाले 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:56 AM

सिगारेटप्रमाणेच भारतात बीडीचाही धुम्रपान करण्यासाठी वापर करण्यात येतो. बीडी ओढणाऱ्या लोकांचा एक मोठा गट असून व्यसन म्हणून अनेक लोक बीडी ओढत असतात.

सिगारेटप्रमाणेच भारतात बीडीचाही धुम्रपान करण्यासाठी वापर करण्यात येतो. बीडी ओढणाऱ्या लोकांचा एक मोठा गट असून व्यसन म्हणून अनेक लोक बीडी ओढत असतात. बीडीच्या अतिसेवनाने झालेल्या आजारांमुळे आणि अकाली मृत्यूमुळे भारतात वर्ष 2017मध्ये 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे. 

सिगारेटपेक्षाही बीडी भारतामध्ये फार लोकप्रिय असून धूम्रपानासाठी लागणारा तंबाखूचा 81 टक्के भाग यामध्ये वापरण्यात येतो. देशाभरात वयाच्या 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 7.2 कोटी लोक बीडी ओढतात. 

'टोबॅको कंट्रोल' या मासिकातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार, केरळमधील 'सेन्टर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्च' (सीपीपीआर) ने केलेल्या रिसर्चनुसार, बीडीमध्ये सामान्य सिगारेटच्या तुलनेत कमी तंबाखू वापरण्यात आलेली असते. परंतु यामध्ये निकोटिनचा स्तर जास्त असतो. तसेच सिगारेटच्या तुलनेत बीडी हळूहळू जळते. अशातच ती ओढणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात जास्त रसायन प्रवेश करतं. 

ज्याप्रमाणे सिगारेटच्या अतिसेवनाने अनेक श्वसनासंदर्भातील आजारांचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात बीडी ओढल्याने कॅन्सर, टीबी, फुफ्फुसासंबंधातील अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तरिदेखील सिगारेटच्या तुलनेत बीडीवर अत्यंत कमी कर आकारण्यात येतो. 

भारतात आतापर्यंत कधीही बीडी ओढल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानाचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. आर्थिक नफा आणि नुकसानासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, आजार आणि अकाली मृत्यूमुळे भारताला 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे. 

सर्व खर्च म्हणजेच, मेडिकल तपासणी, औषधं, डॉक्टरांची फी, हॉस्पिटलचा खर्च हे सर्व एकत्र करून आतापर्यंत जवळपास 168.7 अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अप्रत्यक्ष खर्च म्हणजेच, नातेवाईकांचा राहण्याचा खर्च, काळजी घेणं, जेवण आणि कर्ता माणूस आजारी पडल्यामुळे घरामध्ये येणारे उत्पन्न कमी झाले, त्यामुळे यांसारख्या गोष्टींचा एकत्रितरित्या 811.2 अब्ज रूपये नुकसान झाले आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सSmokingधूम्रपान