शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

Intermittent Fasting केल्यानं होतात 'हे' गंभीर आजार कायमचे बरे, संशोधतानून नवा खुलास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 5:31 PM

एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

भारतीय जीवनशैलीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. उपवास हा केवळ श्रद्धा आणि भक्तीशी संबंधित नाही, तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे वजन संतुलित राहते, पचन यंत्रणेला आराम मिळतो, कॉलेस्टेरॉल कमी होते आणि मानसिक शांती मिळते. उपवासाने देखील मन शांत राहण्यास मदत मिळते. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

संशोधकांच्या मते, उपवासाची ही पद्धती आपण जीवनशैलीत समाविष्ट केली तर त्यामुळे डायबिटीस आणि उच्च रक्तदाबापासून आराम मिळू शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष एंडोक्राइन रिव्ह्यूज जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत, जे सायन्स डेलीने देखील प्रकाशित केले आहे.

कॅलिफोर्नियामधील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजचे प्राध्यापक सच्चिदानंद पांडा म्हणाले, “ठराविक वेळेत जेवून (Intermittent fasting) उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जागृक असलेल्यांनी ते काय खातात यासोबतच त्यांनी काय आणि कधी खावे याकडेही लक्ष दिले पाहिजे. उपवासाची ही पद्धत लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

ठराविक वेळात खाणे ही उपवास किंवा आहाराची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एका विशिष्ट वेळापर्यंत काहीह न खाता त्यानंतर अन्न खाल्ले जाते. याचा प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर अन्न खाल्ले जाते. कोणत्या वेळी अन्न खावे आणि कोणत्या वेळी नाही, हे ठरवले जाते. काही लोक १२ तासांच्या उपवासानंतर अन्न खातात. काही १४ ते १८ तास काहीही खात नाहीत, पण जेव्हा ते अन्न खातात तेव्हा ते कमी कार्बोहायड्रेट आणि अधिक प्रथिने आणि फायबर घेतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स