शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:16 IST

सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे.

सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे. डासांची पैदासही पावसाळ्यामध्ये वाढते. त्यामुळे या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खाण्या-पिण्याबाबत सतर्क राहणं आवश्यक असतं. पावसाळा आला म्हणजे, तळलेले गरमा-गरम पदार्थ खाण्याची इच्छा आलीच. पण जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये हेल्दी राहून स्वतःची काळजी घ्यायची असेल तर मात्र या 6 गोष्टी करणं टाळावं लागेल. 

पालेभाज्या, कोबी दूर ठेवा

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किटक आणि डासांच्या प्रजननाचा काळ असतो. हे किडे फळांवर आणि भाज्यांवर खासकरून हिरव्या पालेभाज्यां जसं की, कोबीची भाजी, ब्रोकली, पालक इत्यादींवर आसरा घेतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या भाज्यांचे सेवन करणं टाळा. तसेच या भाज्यांचा आहारात समावेश करत असाल तर व्यवस्थित पाहून, स्वच्छ करून त्यानंतरच करा. 

स्ट्रीट फूडपासून दूर राहा

पावसाळ्यामध्ये अनेक बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. तसेच त्यांची वाढही वेगाने होत असते. अशातच या वातावरणामध्ये स्ट्रीट फूड म्हणजेच, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या स्टॉल्सवरील अन्नपदार्थ खाणं टाळावं. मग ते चाट असो किंवा गोलगप्पे नाहीतर ज्यूस असो. रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे पावसाचं पाणी त्या पदार्थांमध्ये जाण्याची शक्यता असते. तसेच इतर किटकही त्या पदार्थांवर बसू शकतात. परिणामी अनेक हानिकारक बॅक्टेरियांचा या पदार्थांवर समावेश होतो. तसेच ते पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी स्वच्छ असेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला फूड पॉइझनिंग, डायरिया यांसारख्या आजारांचा धोका संभवतो. 

तळलेले आणि भाजलेले तेलकट पदार्थ 

पावसाळ्यामध्ये शक्य असेल तेवढं तळलेल्या पदार्थांपासून दूर राहणं फार कठिण असतं. पण तुम्ही तळलेल्या पदार्थांपासून जेवढं दूर रहाल तेवढं उत्तम. खरं तर पावसाळ्यातील वातावरणाचा आपल्या शरीराच्या पचनक्रियेवरही परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर खूप तळलेले पदार्थ पचवू शकत नाही. परिणामी पोटाचं आरोग्य बिघडतं. 

कापलेली फळं 

पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य बॅक्टेरियांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आधीपासून कापलेल्या फळांचं सेवन अजिबात करू नका. अनेकदा रस्त्यावरून येता-जाता आपण पाहतो की, स्टॉलवर फळं कापून विकण्यासाठी ठेवली जातात. अशा फळांचं सेवन करणं टाळावं. आधीपासूनच कापून ठेवलेल्या फळांमध्ये माश्या, डास यांसारखे किटक बसतात. त्यामुळे अनेक बॅक्टेरिया फळांवर चिकटतात. अशा फळांचं सेवन केल्याने आजारी पडू शकतो. 

आंबट पदार्थ 

आंबट खाद्यपदार्थ जसं की, चिंच, लोणची किंवा चटणीचे विविध प्रकार यांसारख्या पदार्थांचे सेवन करणं शक्यतो टाळावं. यामुळे शरीरामध्ये वॉटर रिटेंशनची समस्या होऊ शकते आणि पावसाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे या वातावरणामध्ये हेल्दी राहायचं असेल तर आंबट पदार्थांपासून दूर राहणं उत्तम ठरतं. 

सी फूड खाणं टाळा

अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की, मान्सूनचा काळ मासे आणि प्रॉन्सच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या वातारवरणामध्ये मासे,  प्रॉन्स यांसारखे पदार्थ अजिबात खाऊ नका. तसेच पावसाळ्यामध्ये हेव्ही नॉनव्हेज पदार्थांपासून दूर राहणंचं उत्तम ठरतं. परंतु जर तुम्हाला नॉन व्हेज खाणं आवडत असेल तर सी फूडपासून दूर राहा आणि चिकन, मटण यांचं सेवन करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार