शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:16 IST

सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे.

सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे. डासांची पैदासही पावसाळ्यामध्ये वाढते. त्यामुळे या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खाण्या-पिण्याबाबत सतर्क राहणं आवश्यक असतं. पावसाळा आला म्हणजे, तळलेले गरमा-गरम पदार्थ खाण्याची इच्छा आलीच. पण जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये हेल्दी राहून स्वतःची काळजी घ्यायची असेल तर मात्र या 6 गोष्टी करणं टाळावं लागेल. 

पालेभाज्या, कोबी दूर ठेवा

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किटक आणि डासांच्या प्रजननाचा काळ असतो. हे किडे फळांवर आणि भाज्यांवर खासकरून हिरव्या पालेभाज्यां जसं की, कोबीची भाजी, ब्रोकली, पालक इत्यादींवर आसरा घेतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या भाज्यांचे सेवन करणं टाळा. तसेच या भाज्यांचा आहारात समावेश करत असाल तर व्यवस्थित पाहून, स्वच्छ करून त्यानंतरच करा. 

स्ट्रीट फूडपासून दूर राहा

पावसाळ्यामध्ये अनेक बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. तसेच त्यांची वाढही वेगाने होत असते. अशातच या वातावरणामध्ये स्ट्रीट फूड म्हणजेच, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या स्टॉल्सवरील अन्नपदार्थ खाणं टाळावं. मग ते चाट असो किंवा गोलगप्पे नाहीतर ज्यूस असो. रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे पावसाचं पाणी त्या पदार्थांमध्ये जाण्याची शक्यता असते. तसेच इतर किटकही त्या पदार्थांवर बसू शकतात. परिणामी अनेक हानिकारक बॅक्टेरियांचा या पदार्थांवर समावेश होतो. तसेच ते पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी स्वच्छ असेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला फूड पॉइझनिंग, डायरिया यांसारख्या आजारांचा धोका संभवतो. 

तळलेले आणि भाजलेले तेलकट पदार्थ 

पावसाळ्यामध्ये शक्य असेल तेवढं तळलेल्या पदार्थांपासून दूर राहणं फार कठिण असतं. पण तुम्ही तळलेल्या पदार्थांपासून जेवढं दूर रहाल तेवढं उत्तम. खरं तर पावसाळ्यातील वातावरणाचा आपल्या शरीराच्या पचनक्रियेवरही परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर खूप तळलेले पदार्थ पचवू शकत नाही. परिणामी पोटाचं आरोग्य बिघडतं. 

कापलेली फळं 

पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य बॅक्टेरियांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आधीपासून कापलेल्या फळांचं सेवन अजिबात करू नका. अनेकदा रस्त्यावरून येता-जाता आपण पाहतो की, स्टॉलवर फळं कापून विकण्यासाठी ठेवली जातात. अशा फळांचं सेवन करणं टाळावं. आधीपासूनच कापून ठेवलेल्या फळांमध्ये माश्या, डास यांसारखे किटक बसतात. त्यामुळे अनेक बॅक्टेरिया फळांवर चिकटतात. अशा फळांचं सेवन केल्याने आजारी पडू शकतो. 

आंबट पदार्थ 

आंबट खाद्यपदार्थ जसं की, चिंच, लोणची किंवा चटणीचे विविध प्रकार यांसारख्या पदार्थांचे सेवन करणं शक्यतो टाळावं. यामुळे शरीरामध्ये वॉटर रिटेंशनची समस्या होऊ शकते आणि पावसाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे या वातावरणामध्ये हेल्दी राहायचं असेल तर आंबट पदार्थांपासून दूर राहणं उत्तम ठरतं. 

सी फूड खाणं टाळा

अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की, मान्सूनचा काळ मासे आणि प्रॉन्सच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या वातारवरणामध्ये मासे,  प्रॉन्स यांसारखे पदार्थ अजिबात खाऊ नका. तसेच पावसाळ्यामध्ये हेव्ही नॉनव्हेज पदार्थांपासून दूर राहणंचं उत्तम ठरतं. परंतु जर तुम्हाला नॉन व्हेज खाणं आवडत असेल तर सी फूडपासून दूर राहा आणि चिकन, मटण यांचं सेवन करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार