शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

आयुर्वेदानुसार कुणी खाऊ नये दूध आणि दही? शरीरात जमा होतील विषारी पदार्थ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 10:24 IST

Health Tips : बऱ्याच लोकांना ही समस्या होते की, ते पौष्टिक आहार घेऊनही कमजोर असतात किंवा आजारी पडत असतात. याचं कारण तुमचं फूड कॉम्बिनेशन योग्य नसू शकतं.

Health Tips : आयुर्वेदात खाण्या-पिण्याच्या पद्धतींबाबत खूप काही सांगण्यात आलं आहे. तुम्ही काय खात आहात, कधी खात आहात, कसे खात आहात आणि कशासोबत काय खात आहात या सगळ्या गोष्टींचा आरोग्यावर प्रभाव पडतो. 

बऱ्याच लोकांना ही समस्या होते की, ते पौष्टिक आहार घेऊनही कमजोर असतात किंवा आजारी पडत असतात. याचं कारण तुमचं फूड कॉम्बिनेशन योग्य नसू शकतं. आयुर्वेदात याला विरूद्ध आहार म्हटलं जातं. याचा अर्थ असा की, तुम्ही अशा गोष्टी एकत्र खात आहात ज्या एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, विरुद्ध आहारात येणाऱ्या गोष्टी फायद्यांपेक्षा नुकसान जास्त करतात. उदाहरण द्यायचं तर बरेच लोक दूध आणि केळ सोबत खातात. हे आयुर्वेदानुसार चुकीचं आहे.

दूध आणि मासे

दूध कधीही मास्यांसोबत खाऊ नये. कारण दोन्ही गोष्टी विरूद्ध आहेत. दूध थंड असतं आणि मासे गरम असतात. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने रक्त दुषित होऊ शकतं. तसेच मीठ आणि दूध एकत्र खाणंही टाळलं पाहिजे.

केळ आणि दूध

केळ कधीच दूध, दही किंवा छाससोबत खाऊ नये. कारण याने तुमची पचनक्रिया कमजोर होते आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. यांचं एकत्र सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि एलर्जी होऊ शकते.

रात्री खाऊ नये दही

दही जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात खातात. दह्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. पण याचं रात्री सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. याने पोटासंबंधी समस्या वाढण्याचा धोका असतो.

मध आणि तूप

मध गरम केल्याने त्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात. त्यामुळे विषारी पदार्थ जमा होतात. मध आणि तूप समान प्रमाणात कधीच सेवन करू नये कारण याने शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. 

कुणी खाऊ नये पनीर?

दही कधीही दुपारच्या जेवणासोबत खावं. कारण याने पचनक्रिया मजबूत होते. तेही तुमचं पचन तंत्र मजबूत असेल तर खावं. जर असं नसेल तर दह्यामुळे सूज येऊ शकते आणि पित्त व कफ वाढू शकतो. पनीर पचवण्यास बराच वेळ लागतो. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होण्याचा धोका असतो. पचन तंत्र कमजोर असलेल्या लोकांनी पनीरचं सेवन करू नये.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य