शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत असून, या पावसामुळे सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहून लागले आहेत. तसेच अनेक नदी-नाल्यांना पूरसुद्धा आला आहे. त्यावर रानावनात, दगडांतून झरे व धबधबेसुद्धा पाण्यातून कर्णमधुर संगीत निर्माण करीत आहेत. सालेकसा तालुक्याचा सुप्रसिद्ध हाजराफाॅल धबधबा लोकांना भुरळ घालत आहे. युवक-युवती हाजराफाॅल धबधब्याचा आनंद घ्यायला येऊ लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो. म्हणून पुराच्या पाण्यापासून पुरेशा अंतरावर राहून पाहणे हितकारक ठरेल. सालेकसा तालुक्यातील हाजराफाॅल धबधबा, देवरी तालुक्याचा ढासगड धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. परंतु पाण्याचे आकर्षण वाढताच लोक जवळ जाऊन वेगाने पडणाऱ्या किंवा वाहणाऱ्या पाण्यासोबत खेळू लागतात, अशात तोल जाऊन धोका निर्माण होताे. देवरी सालेकसा तालुक्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसरार धरण, तिरोडा तालुक्यातील खरबंदा, बोदलकसा जलाशय किंवा जिल्ह्यातील इतर छोटी-मोठी जलाशये तुडुंब भरलेली असून काही जलाशयांतून पाण्याचा विसर्गसुद्धा होत आहे. अशा ठिकाणी तरुण-तरुणी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु सेल्फीच्या नादात तोल जाऊन धोका होतो. नवेगावबांध येथील जलाशयात लोक नौकाविहार करण्याचा हेतूने येतात. परंतु पावसाळ्यात नौकाविहार करणे खूपच जास्त धोक्याचे असते. बोट उलटून लोक बुडत असल्याचा सतत घटना घडत आहेत. तरीसुद्धा लोक दक्षता बाळगताना दिसत नाहीत. 

आतापर्यंत अनेकांचे बळी- मागील सहा सात वर्षात हाजराफाॅलमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीची देखरेख वाढली असून येथील नवयुवक ठिकठिकाणी नजर ठेवून असतात. त्यामुळे येथे अपघात कमी झाले. परंतु त्या आधी दोन दशकात अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले. तेही पहाडीवरुन तलावात पडून बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पाण्याशी खेळ नकोच !- पावसाळ्यात जलाशयात खूप वाहत पाणी असून अशात बोटीवर फिरत असताना काही जण बोटीच्या एकाच बाजूवर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. अशात बरेचदा नाव उलटत असते. काहींना बोटीवर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोठा नाद असतो, परंतु हा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून बोटीवर सेल्फी आणि पाण्याशी खेळ नकोच.

धोका पत्करू नका - पर्यटकांनी पहाडावर किंवा मोठ्या दगडावर चढूृ नये, शिवाय पहाडावरुन सतत पाणी पाझरत असून चढता उतरता मोठा धोकादायक असते. काही लोक झाडाच्या फांद्या पकडून वर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु पावसाळ्यात झाडाचे बुड कमजोर झालेले असतात तसेच फांद्यावरुन हात घसरतो आणि अपघात झाल्यास खाली पाण्यात पडण्याची भीती असते. 

मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असून नदी नाल्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हाजराफाॅलला पाण्याची पातळी वाढली असून तलावात सुध्दा पाणी वाढले असून प्रवाहाचा वेग सुध्दा वाढला आहे. अशात पर्यटकांनी सेल्फी काढण्यासाठी जवळ जाऊ नये तसेच पहाडावर अजिबात चढू नये. -अभिजित इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी सालेकसा.

 

टॅग्स :tourismपर्यटन