शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांनी विधी सेवेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: May 13, 2017 01:43 IST

सर्वांना न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत मोफत

इशरत शेख : कायदेविषयक साक्षरता जनजागृती कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सर्वांना न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत मोफत विधी सहाय दिले जाते. कामगारांनी सुध्दा विधी सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव इशरत शेख यांनी केले. तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट मध्ये आयोजित कायदेविषयक सारक्षता जनजागृती कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा येथील न्या.आर.एस.पाजनकर, न्या.ए.बी.तहसीलदार, न्या. आर.डी.भुयारकर, न्या.पी.सी.बच्छेले, न्या.व्ही.पी.खंडारे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.टी.बी.कटरे, अ‍ॅड.जे.एल.परमार, अ‍ॅड.बोंबार्डे, अ‍ॅ्रड.वाय.एस.हरिणखेडे, संजय अरगडे, एच.आर.प्रमुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शेख यांनी, कार्यक्र मात उपस्थित प्रत्येकाने तसेच ज्यांना कामगारांच्या हिताच्या कायदयाबाबतचे ज्ञान आहे त्यांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांना विधी सेवेबाबतची माहिती दयावी, जेणेकरु न कामगारांना त्यांच्या हिताचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेता येईल असे सांगीतले. न्या.तहसीलदार यांनी, कामगारांच्या हिताच्या विविध कायद्यांवर आधारित माहिती दिली. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.कटरे यांनी, कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रि येबाबत माहिती दिली. अ‍ॅड.परमार यांनी, कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे निर्माण करण्यात आल्याचे सांगितले. अ‍ॅड.बोंबार्डे यांनी, कामगार व कंपनी मालक यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे, जेणेकरु न दोघांचेही हित साध्य होईल असे सांगितले. अदानी पॉवर प्लांटचे मुख्य व्यवस्थापक एस.के.मित्रा यांनी अदानी प्लांटमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार तसेच वेळोवेळी येणाऱ्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक योजनांचा लाभ दिला जातो. तसेच नुकसान भरपाई, मोफत वैद्यकीय तपासणी व इतर लाभ दिले जातात असे सांगितले. यावेळी अ‍ॅड.बढे यांनीही मार्गदर्शन केले. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर.एस.पाजणकर यांनी, कामगारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, तर भारतीय संविधानाचे वचन पूर्ण होईल. कामगारांवर अन्याय होत असेल तर त्यांनी नक्कीच न्यायालयात दाद मागायला पाहिजे. कामगारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करु न देणे हे विधी सेवा संस्थांची जबाबदारी आहे असे प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्र माला अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. एम.आर.रहांगडाले यांनी केले. उपस्थितांचे आभार न्या.व्ही.पी.खंडारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तिरोडा येथील दिवाणी न्यायालयात व अदानी प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.