शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी प्रकल्प विभागीय कार्यालयाचा वाली कोण?

By admin | Updated: November 16, 2014 22:52 IST

राज्यात आदिवासींच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. परंतु आदिवासींच्या विकासाची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे तोच विभाग वाऱ्यावर आहे.

आमगाव : राज्यात आदिवासींच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. परंतु आदिवासींच्या विकासाची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे तोच विभाग वाऱ्यावर आहे. देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कारभारावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे आदिवासींचा विकास कसा साधणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासींचे राहणीमान उंचावण्यासह त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त निधीच्या सहाय्याने हे धोरण यशस्वी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणात शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाच्या सोयीने मिळण्यासाठी निवासी आश्रमशाळांची सुरुवात राज्यात केली आहे. शिक्षणासह त्यांना आर्थिक मदतीची योजनाही प्रारंभ करण्यात आली. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यान्वित केला. परंतु या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विभागालाच वेशीवर टांगले असल्याने विकास कागदावरच रेखाटण्यात येत आहे. राज्य आदिवासी विकास विभागाअंतर्गत नागपूर विभागात शासकीय आश्रमशाळा १०२ तर खासगी अनुदानित आश्रमशाळा १५२ आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प विभाग आदिवासींच्या विकासात्मक योजना यशस्वीपणे राबविण्यात मागे पडत आहे. या विभागावर शासनाचे योग्य नियंत्रण नसल्याने या कार्यालयात आर्थिक देणगीवर फाईल पूर्ण करण्यात येते. प्रकल्प विभागात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मागणीला हाताळण्यासाठी विविध टेबलांवरील लक्ष्मीदर्शनातून पुढे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या फायली बंद अवस्थेत धूळ खात असल्याचे चित्र दिसते. प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही आर्थिक शोषण होते. वैद्यकीय बिल, पगार देयके, योजनांचा निधी याबद्दल कार्यालयात समयसुचकता नसल्याने विभागांतर्गत कर्मचारी व आदिवासी नागरिकांना आर्थिक फटका सोसावा लागतो. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचे वेळापत्रक नसल्याने कर्मचारी बेलगाम असल्याचे दिसते. त्यामुळे या विभागाचा वाली कोण? असा प्रश्न पुढे आला आहे. शासनाने या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शुद्धीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.आदिवासी प्रकल्प कार्यालयात विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांची दैनंदिन कामांसाठी कार्यालयात वर्दळ असते, परंतु कार्यालयीन वेळेतच विभागातील अधिकारी, कर्मचारी बाजारी गेल्याचे सांगितले जाते. (शहर प्रतिनिधी)